नवी दिल्ली : विविध समस्यांनी ग्रासल्यामुळे ठप्प झालेल्या बांधकाम व्यवसायास गती देण्यासाठी केंद्र सरकारने बुधवारी काही महत्त्वपूर्ण उपाययोजनांना मंजुरी दिली. वाद निवारण, भांडवलव्यवस्था आणि अडकलेल्या कर्जाची समस्या दूर करणे, यासाठी या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपाययोजनांना मंजुरी देण्यात आली. वादविवादावर तातडीने निर्णय मिळविण्यासाठी कंत्राटदारांना नव्या लवाद प्रक्रियेचा अवलंब करण्याची परवानगी देण्यात आली आहे. वादातील ७५ टक्के रक्कम बँक गॅरंटीच्या बदल्यात अदा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. नव्या प्रकल्पांवरील वादांबाबत तडजोड करण्यासाठी स्वतंत्र तज्ज्ञांचे एक बोर्ड स्थापन करण्याच्या व्यवस्थेस मंजुरी देण्यात आली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
बांधकाम क्षेत्राचे पुनरुज्जीवन करणार
By admin | Updated: September 1, 2016 04:38 IST