Join us

‘कोल इंडिया’ करणार भरती

By admin | Updated: January 4, 2015 22:16 IST

सरकारच्या मालकीची कोळसा कंपनी कोल इंडिया पुढील महिन्यात सुमारे ८00 कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करणार आहे.

नवी दिल्ली : सरकारच्या मालकीची कोळसा कंपनी कोल इंडिया पुढील महिन्यात सुमारे ८00 कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करणार आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. त्यानुसार, पुढील ५ वर्षांत कोल इंडियाचे कोळसा उत्पादन दुप्पट करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. ही योजना यशस्वी झाल्यास कंपनीचे उत्पादन १ अब्ज टनावर जाईल. यासाठी कंपनीला अधिक मनुष्यबळाची गरज आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांची भरती केली जाणार आहे. नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती मनुष्यबळ विकास, वित्त, विपणन आणि विक्रीसह विभिन्न विभागांत होणार आहे.