Join us  

पुढील 5 वर्षांत 10,000 लोकांना रोजगार देणार PwC India, 1600 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 6:52 PM

jobs : पनीने आपले नवीन व्यवसाय धोरण 'द न्यू इक्वेशन'  (The New Equation)  जाहीर केले आणि पुढील पाच वर्षांत आपल्या कॅम्पस हायरिंगला सुद्धा पाचपेक्षा जास्त वाढ करणार असल्याचे सांगितले.

नवी दिल्ली : ग्लोबल कंसल्टेंसी फर्म पीडब्ल्यूसी इंडिया (PwC India) पुढील पाच वर्षांत भारतातील १०,००० लोकांना नोकऱ्या देईल. या कालावधीत कंपनी १,६०० कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. कंपनीने आपले नवीन व्यवसाय धोरण 'द न्यू इक्वेशन'  (The New Equation)  जाहीर केले आणि पुढील पाच वर्षांत आपल्या कॅम्पस हायरिंगला सुद्धा पाचपेक्षा जास्त वाढ करणार असल्याचे सांगितले.

एनबीटीच्या वृत्तानुसार, कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, 'द न्यू इक्वेशन' ट्रेंडचे विश्लेषण हजारो ग्राहक आणि भागधारकांशी झालेल्या चर्चेवर आधारित आहे. पीडब्ल्यूसी इंडियाचे अध्यक्ष संजीव कृष्ण म्हणाले, "देशाच्या लोकसंख्याशास्त्रीय लाभांश आणि नाविन्यपूर्ण तेजीला चालना देण्यासाठी एक परिसंस्था म्हणून भारताची आर्थिक पायाभूत सुविधा (Economic Infrastructure) मजबूत आहे. आमच्या नवीन धोरणामुळे आम्हाला आणि आमच्या ग्राहकांना देशाच्या आर्थिक विकासाला पुढे नेणे, देशांतर्गत बाजारपेठेच्या संभाव्यतेचा फायदा घेणे आणि समाजासाठी व्यापक मार्गाने अधिक संधी निर्माण करणे शक्य होईल."

डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएम करतेय 20,000 सेल्स एक्झिक्युटिव्हची नियुक्तीपेटीएमने व्यापाऱ्यांना डिजिटल मीडिया स्वीकारण्याबद्दल शिक्षित करण्यासाठी देशभरातील सुमारे २०,००० फील्ड सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणजेच एफएसई (Field Sales Executives) नेमण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. याबाबत माहिती असलेल्या सूत्रांनी ही माहिती दिली. नोकरीशी संबंधित पेटीएमच्या जाहिरातीनुसार, फील्ड सेल्स एक्झिक्युटिव्हला मासिक पगार आणि कमिशनमध्ये ३५,००० रुपये आणि त्याहून अधिक नफा मिळवण्याची संधी असेल. कंपनीला तरुण आणि पदवीधरांना एफएसई म्हणून नियुक्त करायचे आहे.

टॅग्स :नोकरीव्यवसाय