Join us

पुणे जिल्हा पुढीलवर्षी मार्चपर्यंत टँकरमुक्त करा

By admin | Updated: June 12, 2015 17:38 IST



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना
पुणे : जलयुक्त शिवार अभियानातून जिल्‘ात यावर्षी हाती घेतलेली कामे पुढीलवर्षी मार्चपर्यंत पूर्ण करा. त्याचबरोबर पुढील वर्षी एकही टँकर द्यावा लागू नये अशा पद्धतीने नियोजन करून जिल्हा टँकरमुक्त करा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिल्या.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज जलयुक्त शिवार अभियानाबाबत आढावा बैठक झाली. त्यावेळी त्यांनी वरील सूचना दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयात काल (गुरुवारी) रात्री उशिरा ही बैठक झाली. या बैठकीस पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, जलसंधारण सचिव प्रभाकर देशमुख, विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी सौरभ राव तसेच जिल्‘ातील खासदार आणि आमदार उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, जलयुक्त शिवार योजनेतून राज्यात मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत. या कामातून अतिशय चांगली कामे होत आहेत. लोकांचा सहभागही चांगला आहे. पुणे जिल्‘ातील काम अतिशय मॉडेल अशा स्वरूपाचे आहे. पण जिल्‘ातील विहीरींचे पुनर्भरण होईल, अशा पद्धतीने काम करायला हवे. नदी आणि ओढ्यांचे पुनरूज्जीवन होण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने पुढील वर्षीच्या कामात नियोजन करावे.
जलयुक्त शिवार अभियानातील कामाबरोबरच जिल्‘ातील सर्वच जलस्त्रोतांचे मॅपिंग करा. सर्व जलस्त्रोतांचे पुनर्भरण होईल यादृष्टीने प्रयत्न केले तर मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध होईल, असे फडणवीस यांनी सांगितले.
सहकारी संस्थांनीही जलयुक्त शिवार अभियानासाठी निधी देण्याची आवश्यकता आहे, अशी सूचना फडणवीस यांनी केली. त्याचबरोबर शहरी भागातील लोकप्रतिनिधींनी किमान दोन गावे दत्तक घ्यायला हवीत, असे आवाहनही त्यांनी केले. जुन्या योजनांच्या दुरुस्तीसाठी जलसंधारणाच्या सर्व निधीत किमान २५ टक्के निधी जलयुक्त शिवार अभियानासाठी राखीव ठेवला जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.
सौरभ राव यांनी जिल्‘ात सुरू असलेल्या कामाचे सादरीकरण केले. जिल्हा
परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग बारणे, अमर साबळे, संजय काकडे, आमदार भीमराव तापकीर, गौतम चाबूकस्वार, लक्ष्मण जगताप, मेधा कुलकर्णी, राहुल कुल, दत्तात्रय भरणे, सुरेश गोरे, महेश लांडगे, संजय ऊर्फ बाळा भेगडे त्याचबरोबर कृषी, सामाजिक वनीकरण, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पाच हजार गावे दरवर्षी दुष्काळमुक्त

जलयुक्त शिवार अभियानाची पुणे जिल्ह्यात वीस कोटींची कामे सुरु असून पहिल्या टप्प्यात दोनशे गावे दुष्काळमुक्त केली जातील. राज्यात जेथे टॅंकर सुरु आहेत अशी पाच हजार गावे दरवर्षी दुष्काळमुक्त करण्यात येतील. जलयुक्त शिवार अभियानातील कामांमुळे २००९ पर्यंत राज्य दुष्काळमुक्त होऊ शकेल. पुणे जिल्‘ात गेल्या वर्षी ५६ टॅंकर सुरु होते, यंदा ही संख्या २५ वर आली आहे. पुढील वर्षी पुणे जिल्‘ात एकही टॅंकर नको, असे सांगून फडणवीस पत्रकारांना म्हणाले पुणे शहरातील लोकप्रतिनिधींना काही गावे दत्त्तक घेण्याचे आवाहन केले आहे, या योजनेचे आदर्श रुप पुणे जिल्ह्यात आकारास येत आहे, असेही ते म्हणाले.