हजारीबाग : शेतकऱ्यांना धान्याचे विशेषत: डाळींचे उत्पादन वाढविण्यासाठी वैज्ञानिक पद्धत अवलंबण्याचे आवाहन करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्या हरितक्रांतीची हाक दिली आहे.डाळींचे उत्पादन घटल्यामुळे देशाला डाळी आयात कराव्या लागत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. येथे भारतीय कृषी संशोधन संस्थेची (आयएआरआय) कोनशिला बसविल्यानंतर ते बोलत होते. चांगली गुणवत्ता असलेले बियाणे, पुरेसे पाणी, वीज आणि योग्य भाव आणि बाजारपेठेंच्या अभावामुळे भारतीय शेतकरी खूप मागे राहिले आहेत. आम्ही संतुलित आणि समग्र एकात्म योजना तयार करणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचे जीवन बदलता येणार नाही. (वृत्तसंस्था)
पंतप्रधान मोदींनी दिली दुसऱ्या हरितक्रांतीची हाक
By admin | Updated: June 28, 2015 21:35 IST