नवी दिल्ली : ई-रिक्षा आणि ई-कार्ट या वाहनांना सार्वजनिक वाहतुकीचा धंदा करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) परवाना घेण्याची गरज नाही, असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने जाहीर केले.माल किंवा व्यक्तिगत सामानासह प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या ई-रिक्षा व ई-कार्टना मोटार वाहन कायद्याचे कलम ६६ लागू नसेल. सार्वजनिक वाहतुकीसाठी परवाना घेण्यासंबंधीच्या या कलमातून ई-रिक्षा व ई-कार्टना वगळल्यात आले आहे. मात्र, स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन ही वाहने शहराच्या ठरावीक भागांत किंवा ठरावीक रस्त्यांवर चालविण्यास मनाई करण्याचा आदेश राज्य सरकार वाहतूक नियमन नियमांनुसार देऊ शकेल, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. (लोकमत न्यज नेटवर्क)
ई-रिक्षाच्या धंद्यासाठी नाही परवान्याची गरज
By admin | Updated: September 1, 2016 04:38 IST