नवी दिल्ली : भारत त्याच्या सीमा शुल्क प्रक्रियेला सुव्यवस्थित व व्यापार सुगम करीत आहे; परंतु भारताची आयात रचना अजूनही गुंतागुंतीची आहे, असे जागतिक व्यापार संघटनेने (डब्ल्यूटीओ) म्हटले.डब्ल्यूटीओने म्हटले आहे की, भारताने व्यापारी व्यवहार सुगम करण्यासाठी २०११ मध्ये सीमा शुल्क प्रक्रियेचा स्वत:च आढावा घेऊन ९७.६ टक्के आयात जोखीम व्यवस्थापन प्रणालीद्वारे केली आहे.भारताने काही बाबतीत सुधारणा केल्या असल्या तरी भारताची आयात रचना विशेषत: लायसेंसिंग परमिट प्रणाली व तिची शुल्क रचना गुंतागुंतीची आहे. दर उत्पादन किंवा विशिष्ट निर्यात संवर्धन कार्यक्रमानुसार वेगवेगळे आहेत. भारत त्याच्या बौद्धिक संपदा प्रणालीला आधुनिक बनविण्यासाठी अनेक पावले उचलत आहे व बौद्धिक संपदा प्रणाली लागू करण्याचे प्रयत्नही सुरूच ठेवले आहेत. बहुपक्षीय व्यापार प्रणालीसाठी भारत देऊ करीत असलेले सहकार्य स्वीकारताना डब्ल्यूटीओने म्हटले आहे की, भारत काही क्षेत्रीय व्यापार करारांमध्ये सहभागी होता.
भारताची आयात रचना गुंतागुंतीची-डब्ल्यूटीओ
By admin | Updated: June 4, 2015 00:56 IST