Join us

घरे, इंधनाच्या किमती वाढणार!

By admin | Updated: January 28, 2015 00:19 IST

राज्याच्या येत्या अर्थसंकल्पात मोबाईल, जमिनीचे व्यवहार, चटईक्षेत्र निर्देशांक, इंधनाचे दर अशा काही बाबींवरील कराच्या दरात वाढ करून राज्याचे उत्पन्न

मुंबई : राज्याच्या येत्या अर्थसंकल्पात मोबाईल, जमिनीचे व्यवहार, चटईक्षेत्र निर्देशांक, इंधनाचे दर अशा काही बाबींवरील कराच्या दरात वाढ करून राज्याचे उत्पन्न किमान २० हजार कोटी रुपयांनी वाढवण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असल्याचे संकेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.मुनगंटीवार म्हणाले की, मागील सरकारने ५१ हजार २२२ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. प्रत्यक्षात राज्याचे उत्पन्न हे लक्ष्य गाठणे अशक्य होते. त्यामुळे यंदा सर्वच खात्याच्या खर्चांना कात्री लावावी लागली. त्यामुळे आगामी अर्थसंकल्प सुमारे ४५ हजार कोटी रुपयांचा असेल.स्वतंत्र भारतात सुरुवातीला अर्थसंकल्प सादर करताना खर्च होणाऱ्या प्रत्येक रुपयातून राज्याचे काय हित झाले याचा विचार केला जायचा. मात्र गेल्या काही वर्षांत खर्चाचे मोठे आकडे सादर करुन केवळ आभास निर्माण करण्याकडे राज्य सरकारचा कल निर्माण झाला होता. यावेळी पुन्हा वास्तववादी अर्थसंकल्प असेल व प्रत्येक रुपया खर्च करताना त्याच्या लाभाचा विचार केला जाईल, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत सरकारच्या उत्पन्नात १० टक्के वाढ होणार असेल तर प्रत्येक खात्याला द्यायच्या रकमेत सरसकटपणे १० टक्के वाढ केली जायची. यावेळी तसे होणार नाही. खात्यांच्या योजना, त्यांची प्रगती, यापूर्वी खर्च झालेली रक्कम याचा आढावा घेऊन रक्कम मंजूर केली जाईल. मागील सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण करायची झाली तर किमान ५५ हजार कोटी रुपयांची गरज आहे. सध्या तेवढे पैसे सरकारकडे नाहीत. (विशेष प्रतिनिधी)