करणबाबूंच्या आदेशावरुन बातमी आजच घेणे
By admin | Updated: August 28, 2014 20:55 IST
समाजाच्या विकासात वर्तमानपत्राचे योगदान महत्त्वाचे
करणबाबूंच्या आदेशावरुन बातमी आजच घेणे
समाजाच्या विकासात वर्तमानपत्राचे योगदान महत्त्वाचेखा.राजकुमार धूत औरंगाबाद : समाजाच्या विकासासाठी वर्तमानपत्राचे योगदान महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन खा. राजकुमार धूत यांनी येथे केले. सायंदैनिक संजय वार्ताच्या वर्धापन दिन विशेषांकाचे प्रकाशन करताना ते बोलत होते. यावेळी संपादक शिवनाथ राठी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी लोकप्रतिनिधींसह उद्योगपती, व्यापारी, डॉक्टर, वकील अशी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. खा.धूत पुढे म्हणाले की, वर्तमानपत्रांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून समाजाचा व देशाचा विकास करावा. सूत्रसंचालन सहायक संपादक शेखर देसरडा यांनी, तर कार्यकारी संपादक रामेश्वर राठी यांनी आभार मानले. कॅप्शनसंजय वार्ताच्या वर्धापन दिन विशेषांकाचे प्रकाशन करताना खा.राजकुमार धूत व रामेश्वर राठी.