वॉशिंग्टन : जागतिक बाजारात खनिज तेलाच्या किमती घटल्याने भारताला अभूतपूर्व फायदा झाला आहे. त्यामुळे भारताला आपल्या देशातच सामान आणि सेवांवर अधिक खर्च करण्याची संधी मिळाली असून महागाईही घटली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीतर्फे ही माहिती देण्यात आली.आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे (आयएमएफ) भारतविषयक प्रमुख पॉल कॅशिन यांनी बुधवारी सांगितले की, जागतिक बाजारात तेलाच्या किमतीत प्रचंड घट झाल्याने भारत अपेक्षेपेक्षा जास्त फायद्यात राहिला आहे. ते म्हणाले की, तेलाच्या किमती घसरल्याने उपलब्ध झालेला पैसा सामान आणि सेवांसाठी वापरता येत आहे. त्यामुळे देशाबाहेरील बाजारात आणि देशांतर्गत वित्तीय स्थितीत भारताची स्थिती सुधारली. तेलाच्या किमती घटल्यानेच महागाईची तीव्रता कमी झाली.गेल्या दीड वर्षात खनिज तेलाच्या किमती ७० टक्क्यांनी घसरल्या असून त्या अंदाजे ३५ डॉलर प्रति बॅरल झाल्या आहेत. नाणेनिधीच्या ताज्या अहवालात चालू आर्थिक वर्षात भारताचा वृद्धीदर ७.३ टक्के, तर पुढील वित्तीय वर्षात तो ७.५ टक्के राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
तेलाचे भाव घसरल्याने भारताला अभूतपूर्व लाभ
By admin | Updated: March 4, 2016 02:17 IST