मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्पामुळे शेअर बाजारात नैराश्य पसरले असून मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १५२.३0 अंकांनी घसरला. तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४२.७0 अंकांनी घसरला. अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या विविध प्रस्तावांवर बाजारात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असल्याचे बाजारात दिसून आले. एका क्षणी बाजार ६६0 अंकांपर्यंत घसरला होता. वाहनांवरील कर वाढविल्यामुळे वाहन कंपन्यांचे समभाग ४.८८ टक्क्यांपर्यंत घसरले. मारुती सुझुकी, टाटा मोटर्स आणि एमअँडएम या कंपन्यांना सर्वाधिक फटका बसला.
शेअर बाजारात निराशा
By admin | Updated: March 1, 2016 03:33 IST