Join us

कर्ज वाटप हे संचालकांचे काम नाही : एकनाथराव खडसे

By admin | Updated: April 19, 2016 00:49 IST

पीक कर्जाबाबत धोरण ठरविण्याचे काम हे जिल्हा बँकेचे संचालक मंडळ करीत असते. कर्ज वाटप हा प्रशासनाचा भाग आहे. प्रशासनाने त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्याची अपेक्षा आहे. लोकप्रतिनिधी असलेल्या गुलाबराव पाटील यांना इतकी प्राथमिक गोष्ट माहीत नसेल तर देव त्यांचे भले करो. धरणगाव तालुक्यात टिश्यू कल्चरची लागवड झालेली नसताना २०० कोटींचे कर्ज वाटप झाले. त्यात जो दोषी असेल त्यांच्यावर कारवाई होणार आहे. जिल्हा बँकेतील पारदर्शक कारभारामुळे आठ महिन्यात ४०० कोटींच्या ठेवी वाढल्या आहेत.

पीक कर्जाबाबत धोरण ठरविण्याचे काम हे जिल्हा बँकेचे संचालक मंडळ करीत असते. कर्ज वाटप हा प्रशासनाचा भाग आहे. प्रशासनाने त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्याची अपेक्षा आहे. लोकप्रतिनिधी असलेल्या गुलाबराव पाटील यांना इतकी प्राथमिक गोष्ट माहीत नसेल तर देव त्यांचे भले करो. धरणगाव तालुक्यात टिश्यू कल्चरची लागवड झालेली नसताना २०० कोटींचे कर्ज वाटप झाले. त्यात जो दोषी असेल त्यांच्यावर कारवाई होणार आहे. जिल्हा बँकेतील पारदर्शक कारभारामुळे आठ महिन्यात ४०० कोटींच्या ठेवी वाढल्या आहेत.
-एकनाथराव खडसे, महसूल तथा कृषी मंत्री