नवी दिल्ली : आर्थिक वृद्धीला चालना देण्यासाठी विकास खर्च वाढल्याने भारतातील दरडोई कर्जाचा बोजा २०१४-१५ मध्ये २ हजार ९६६ रुपयांनी वाढत ४४,०९५ रुपयांवर गेला आहे. २०१३-१४ मध्ये दरडोई कर्जाचा आकडा ४१,१२९ रुपये होता. सरकारी प्राथमिक लेखा परीक्षणानुसार कर्जाच्या ओझ्यात देशी-विदेशी कर्जाशिवाय इतर देणींचाही समावेश आहे. सरकारवरील कर्जासंबंधीच्या जागतिक बँकेच्या अहवालानुसार एकूण २० विकसनशील देशांच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. भारत सरकारने देशांतर्गत कर्जावरील व्याजापोटी २०१२-१३ मध्ये ४.०४ लाख कोटी, २०१३-१४ मध्ये ४.८५ लाख कोटी आणि २०१४-१५ मध्ये ५.५६ लाख कोटी रुपये खर्च केले. या तीन आर्थिक वर्षात विदेशी कर्जावरील व्याजापोटी क्रमश: ३७.२ कोटी डॉलर, ३६.६ कोटी डॉलर आणि ३८.९ कोटी डॉलर खर्च करण्यात आले.
भारतीयांचे दरडोई कर्ज प्रचंड वाढले
By admin | Updated: July 26, 2015 22:48 IST