Join us

छोट्या शेअर्सनी दिला लाभ

By admin | Updated: December 26, 2015 02:08 IST

दलाल पथवर यंदा, म्हणजे २०१५ मध्ये छोट्या शेअर्सचा बोलबाला राहिला. मिडकॅप व स्मॉल कॅपच्या शेअर्सनी मोठ्या कंपन्या किंवा ब्ल्यू चीपपेक्षा चांगले प्रदर्शन करण्याचे

नवी दिल्ली : दलाल पथवर यंदा, म्हणजे २०१५ मध्ये छोट्या शेअर्सचा बोलबाला राहिला. मिडकॅप व स्मॉल कॅपच्या शेअर्सनी मोठ्या कंपन्या किंवा ब्ल्यू चीपपेक्षा चांगले प्रदर्शन करण्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे. छोट्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना ६ टक्के रिटर्न दिले.२०१५ हे वर्ष संपत आले आहे. या मावळत्या वर्षात मिडकॅपने गुंतवणूकदारांना ६ टक्के रिटर्न दिले, त्याचवेळी स्मॉल कॅपने पाच टक्के रिटर्न दिले. वर्षभरात मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्समध्ये ६ टक्क्यांनी घसरण झाली. मात्र माध्यम आणि छोट्या कंपन्यांनी यंदा गुंतवणूकदारांना दिलेले रिटर्न ते मागील वर्षाच्या तुलनेत फारच कमी आहे. गेल्या वर्षी या कंपन्यांनी ६० टक्क्यांपर्यंत रिटर्न दिले होते.सॅमको सिक्युरिटीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिमीत मोदी यांनी सांगितले की, २०१४ पेक्षा यंदा वृद्धीची अपेक्षा जास्त होती. कारण गेल्या ४० वर्षांत प्रथमच एकाच पक्षाला केंद्रात स्पष्ट बहुमत मिळाले होते; पण राजकीय कारणांमुळे अपेक्षेएवढे निकाल दिसून आले नाहीत. यंदा ४ मार्च रोजी सेन्सेक्स ३०,०२४०.७४ या सर्वोच्च स्तरावर पोहोचला होता. त्याचवेळी ८ सप्टेंबर रोजी तो २४,८३३.५४ या नीचांकी स्तरावरही पोहोचला.मिडकॅप सूचकांक १० आॅगस्ट रोजी ११,६६६.२४ अंकांच्या उच्च स्तरावर, तर ७ मे रोजी ९,९८३.५५ अंकाच्या खालच्या स्तरावर आला. स्मॉल कॅपने ५ आॅगस्ट रोजी १२,२०३.६४ या सार्वकालिक सर्वोच्च स्तरावर, तर २५ आॅगस्ट रोजी तो १०,१७८.९८ असा नीचांकी स्तरावर आला होता. जियोजीत बीएनपी परिबाचे गुंतवणूकतज्ज्ञ व्ही.के. विजयकुमार म्हणाले की, यंदा सेन्सेक्स आणि निफ्टी जवळपास ७ टक्क्यांनी घसरले. २०१४ मध्ये त्यांनी ३० टक्क्यांचे रिटर्न दिले होते.चालू वित्तीय वर्षात जीडीपीचा वृद्धीदर आणि कॉर्पोरेट उत्पन्नात वाढ होण्याची बाजाराला अपेक्षा होती, ही अपेक्षा पूर्ण होऊ शकली नाही. निर्यातीवर फार वाईट परिणाम झाला आहे. त्यामुळे वस्तूंच्या किमती खाली आल्या. त्याचा अत्यंत वाईट परिणाम कंपन्यांवर झाला.विदेशी संस्थागत गुंतवणूकदार आॅगस्ट २०१५ पासून सतत विक्री करीत आहेत. त्याचवेळी देशी संस्थागत गुंतवणूकदार सतत खरेदी करीत आहेत. २४ आॅगस्ट रोजी शेअर बाजारात सर्वाधिक घसरण झाली. त्या दिवशी सेन्सेक्सला १६२४.५१ अंकांनी घसरण झाली आणि गुंतवणूकदारांचे सात लाख कोटींचे नुकसान झाले.