Join us

एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग मोठी दुर्घटना टळली : चार ते पाच प्रवासी जखमी

By admin | Updated: September 7, 2015 23:27 IST

नवी दिल्ली : येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी संध्याकाळी एअर इंडियाच्या विमानाला होणारी एक मोठी दुर्घटना टळली. विमानाच्या समोरच्या चाकाला आग लागल्याने आपात्कालीन स्थितीत विमानतळावर उतरत असताना हे विमान अपघातातून थोडक्यात बचावले. या विमानात १५० प्रवासी होते. दरम्यान, बचाव मोहिमेदरम्यान चार ते पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले.

नवी दिल्ली : येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी संध्याकाळी एअर इंडियाच्या विमानाला होणारी एक मोठी दुर्घटना टळली. विमानाच्या समोरच्या चाकाला आग लागल्याने आपात्कालीन स्थितीत विमानतळावर उतरत असताना हे विमान अपघातातून थोडक्यात बचावले. या विमानात १५० प्रवासी होते. दरम्यान, बचाव मोहिमेदरम्यान चार ते पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले.
एअर इंडियाचे एआय ४०५ हे विमान खजुराहोवरून वाराणसीमार्गे दिल्लीकडे निघाले होते. दिल्ली विमानतळानजीक विमानाच्या समोरच्या चाकाने पेट घेतल्याची सूचना वैमानिकाने दिली. यानंतर दिल्ली विमानतळावर हे विमान आपात्स्थितीत उतरवण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानाच्या नोज व्हीलमध्ये आग लागली होती. आपात्कालीन स्थितीत उतरत असताना विमान रन-वे क्रमांक २७ वर अडकून पडले. मात्र बचाव पथकाने त्वरित विमानाला घेरून प्रवाशांना बाहेर काढले. या बचाव कार्यादरम्यान चार ते पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले.