Join us  

आजपासून सुरू होणार 80 स्पेशल ट्रेन; जाणून घ्या बदललेले नियम अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 8:03 AM

या 80 गाड्या यापूर्वी सुरू असलेल्या 30 विशेष राजधानी आणि 200 विशेष मेल एक्स्प्रेस गाड्यांपेक्षा वेगळ्या असतील.

कोरोना साथीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. दरम्यान काही कामगार व विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. आजपासून म्हणजेच 12 सप्टेंबरपासून भारतीय रेल्वे 40 अतिरिक्त विशेष जोड गाड्या म्हणजेच 80 सोडणार आहे. शुक्रवारी या गाड्यांसाठी रेल्वेचे तिकिटही बुक करण्यात आले. या 80 गाड्या यापूर्वी सुरू असलेल्या 30 विशेष राजधानी आणि 200 विशेष मेल एक्स्प्रेस गाड्यांपेक्षा वेगळ्या असतील.आता या गाड्या ऑपरेटिंग सुरू झाल्यानंतर देशात धावणा-या एकूण गाड्यांची संख्या 310 (Total Trains Running) वर पोहोचेल. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही. के. यादव यांनी या अगोदरच सांगितले होते की, या गाड्यांची तपासणी करून हे निश्चित केले जात आहे की, कोणत्या गाड्यांची प्रतीक्षा यादी मोठी आहे. या 80 गाड्यांचे मार्ग, बुकिंगचे तपशील आणि इतर माहिती जाणून घ्या, जेणेकरून प्रवासापूर्वी आपल्याला कोणतीही अडचण येऊ नये.

  • या गाड्यांमधून प्रवास करणार्‍यांनी कमीत कमी 90 मिनिटांपूर्वी रेल्वे स्थानक गाठावे. सर्व प्रवाशांची रेल्वे स्थानकांवर तपासणी केली जाईल. कोणत्याही प्रवाशात कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्या प्रवाशाला प्रवास करण्यास परवानगी दिली जाणार नाही.
  • या 40 जोड गाड्यांपैकी राजधानी दिल्ली येथून धावणा-या गाड्यांची संख्या खालीलप्रमाणे आहे - 02482, 02572, 02368, 02416, 02466, 02276, 02436, 02430, 02562, 02628, 02616, 02004
  • प्रवाशांना त्यांच्या मोबाईलवर आरोग्य सेतू ऍप देखील ठेवावे लागेल. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी भारतीय रेल्वे प्रवाशांना उशा, ब्लँकेट, पडदे यांसारख्या वस्तू आता देत नाही.
  • परिस्थिती सामान्य झाल्यानंतरही एसी कोचमध्ये या सुविधा उपलब्ध होणार नाहीत. कोरोना साथीच्या नंतरही जेव्हा सामान्य रेल्वे सेवा पुन्हा सुरू होईल, तेव्हा भारतीय रेल्वे एसी कोचमध्ये प्रवास करणा-या प्रवाशांना उशा, चादरी, चादरी, टॉवेल्स आणि इतर तागाच्या वस्तू देणार नाही.
  • सामान्य प्रवासी रेल्वे सेवा पुन्हा सुरू झाल्यानंतर या वस्तू देणे बंद करण्याचा भारतीय रेल्वेचा विचार आहे. अद्याप यासंदर्भात कोणताही औपचारिक निर्णय घेण्यात आलेला नाही.
  • या वस्तूंशिवाय ट्रेनमध्ये शिजवलेले पदार्थ दिले जात नाहीत. फक्त पॅकेज केलेले अन्न दिले जात आहे. असे म्हटले जात आहे की, एकदा रेल्वे सेवा सुरू झाल्यावर या पद्धतीचा अवलंब देखील केला जाऊ शकतो.