Join us

१९४६ ते २0१५ : भारतीय अर्थमंत्र्यांचा विकासाभिमुख इतिहास

By admin | Updated: March 2, 2015 00:04 IST

लियाकत अली खान हे आॅल इंडिया मुस्लिम लीगचे नेते. जवाहरलाल नेहरू अंतर्गत सरकारमध्ये व्हाईस प्रेसिडेंट असताना त्यांच्याकडे अर्थ खात्याची जबाबदारी होती.

संकलन : संदीप आडनाईक -

लियाकत अली खान (१९४६ ते १९४७)लियाकत अली खान हे आॅल इंडिया मुस्लिम लीगचे नेते. जवाहरलाल नेहरू अंतर्गत सरकारमध्ये व्हाईस प्रेसिडेंट असताना त्यांच्याकडे अर्थ खात्याची जबाबदारी होती. २९ आॅक्टोबर १९४६ ते १४ आॅगस्ट १९४७ या कालावधीत अर्थमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. स्वातंत्र्यपूर्व काळ असला तरी त्यांची गणना भारतीय अर्थमंत्री म्हणूनच केली जाते.आर.के. षण्मुगम चेट्टी (१९४७ ते १९४९)आर.के. षण्मुगम चेट्टी हे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या सरकारमध्ये १५ आॅगस्ट १९४७ ते १९४९ या काळात देशाचे अर्थमंत्री होते. खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यानंतरचे पहिले अर्थमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. जॉन माथई (१९४९ ते १९५0)जॉन माथई हे १९४९ ते १९५0 या काळात देशाचे अर्थमंत्री बनले. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविली. चिंतामणराव देशमुख (१९५0 ते १९५७)चिंतामणराव देशमुख हे जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना १९५0 ते १९५७ या काळात देशाचे अर्थमंत्री होते. ते प्रशासकीय सेवा परीक्षेत अव्वल आले होते. त्यांनी सातवेळा अर्थसंकल्प सादर केला आहे.टी.टी. कृष्णम्माचारी (१९५७ ते १९५८)टी.टी. कृष्णम्माचारी हे १९५७ ते १३ फेब्रुवारी १९५८ या काळात अर्थमंत्री होते. एका घोटाळ्यात सहभागी असल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर राजीनामा देण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून दबाव होता. त्यांनी अनेक आर्थिक सुधारणांवर भर दिला होता. कृष्णम्माचारी यांच्याकडे २९ आॅगस्ट १९६३ पासून १९६५ पर्यंत पुन्हा अर्थमंत्री म्हणून कार्यभार देण्यात आला होता.जवाहरलाल नेहरू (१९५८)पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याकडेही अल्पकाळासाठी अर्थखात्याची जबाबदारी होती. १३ फेब्रुवारी १९५८ ते १३ मार्च १९५८ या काळात त्यांनी अर्थमंत्रिपदाची धुरा सांभाळली. मोरारजी देसाई (१९६७ ते १९६९)मोरारजी देसाई हे पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान आहेत. १३ मार्च १९५८ ते २९ आॅगस्ट १९६३ या काळात ते अर्थमंत्री होते. त्यानंतर १३ मार्च १९६७ ते १६ जुलै १९६९ या काळात त्यांच्याकडे पुन्हा अर्थमंत्रिपदाचा कार्यभार होता. सचिंद्र चौधरी (१९६५ ते १९६७)सचिंद्र चौधरी यांच्याकडे १९६५ पासून १३ मार्च १९६७ पर्यंत अर्थमंत्रिपद होते.यशवंतराव चव्हाण(१९७१ ते १९७५)इंदिरा गांधी पंतप्रधान असताना यशवंतराव चव्हाण यांनी चार वर्षे अर्थमंत्रिपद भूषविले. १९७१ ते १९७५ हा त्यांचा अर्थमंत्रिपदाचा कालावधी होता.इंदिरा गांधी (१९७0-७१)इंदिरा गांधी या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. १९६६ मध्ये त्या पंतप्रधान झाल्या. त्यांच्याकडेही १९७0 ते १९७१ या काळात अर्थमंत्रिपद होते. सी. सुब्रमण्यम (१९७५ ते १९७७)सी. सुब्रमण्यम हे १९७५ ते १९७७ या दोन वर्षांच्या काळात देशाचे अर्थमंत्री होते. हरिभाई एम. पटेल (१९७७ ते १९७९)हरिभाई एम. पटेल हे जनता पक्षात मोरारजी देसाई यांच्या कॅबिनेटमध्ये २४ मार्च १९७७ ते २४ जानेवारी १९७९ या कालावधीत देशाचे अर्थमंत्री होते. १९५९ च्या बॅचचे सर्वोच्च रँकिंगमध्ये उत्तीर्ण झालेले सिव्हिल सर्व्हंट, असा त्यांचा लौकिक होता.चौधरी चरणसिंग (१९७९)चौधरी चरणसिंग यांच्याकडे २४ जानेवारी १९७९ ते २८ जुलै १९७९ या कालावधीत अर्थमंत्रीपदाची धुरा सोपविण्यात आली होती. नंतर ते काही काळ पंतप्रधानही बनले. हेमवती नंदन बहुगुणा (१९७९ ते १९८0)हेमवती नंदन बहुगुणा हे २८ जुलै १९७९ ते १४ जानेवारी १९८0 या कालावधीत जनता दल (एस)च्या चरणसिंग यांच्या काळात देशाचे अर्थमंत्री होते. प्रणव मुखर्जी (१९८२ ते १९८४)सध्याचे देशाचे १३ वे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे १५ जानेवारी १९८२ ते ३१ डिसेंबर १९८४ या काळात इंदिरा गांधी यांच्या सरकारमध्ये आणि २४ जानेवारी २00९ ते २६ जून २0१२ या काळात अर्थमंत्री बनले. आर. व्यंकटरमण (१९८0 ते १९८२)इंदिरा गांधी पंतप्रधान असताना रामास्वामी व्यंकटरमण हे १४ जानेवारी १९८0 ते १५ जानेवारी १९८२ या काळात अर्थमंत्री बनले. नंतर त्यांनी राष्ट्रपतीपद भूषविले.व्ही.पी. सिंग (१९८४ ते ८७)विश्वनाथ प्रताप सिंग हे ३१ डिसेंबर १९८४ ते २४ जानेवारी १९८७ या कालावधीमध्ये राजीव गांधी यांच्या सरकारमध्ये देशाचे अर्थमंत्री बनले. लायसनराजमुळे त्यांच्यावर बरीच टीकाही झाली होती. नंतर अनुसूचित जातींसाठी सरकारमध्ये नोकऱ्या आरक्षित करण्याच्या मंडल आयोगाची अंमलबजावणी करणारे पंतप्रधान (१९८९-९0) म्हणून ते लोकप्रिय झाले. राजीव गांधी (१९८७-१९८८)खुद्द राजीव गांधी यांच्याकडेच देशाच्या अर्थमंत्रिपदाची धुरा होती. २४ जानेवारी १९८७ पासून २५ जून १९८८ पर्यंत त्यांनी जबाबदारी सांभाळली.नारायण दत्त तिवारी (१९८७-१९८८)राजीव गांधी यांच्या कॅबिनेटमध्ये नारायण दत्त तिवारी हे २५ जुलै १९८७ ते २५ जून १९८८ या काळात देशाचे अर्थमंत्री होते. आंध्र प्रदेशचे राज्यपाल असताना त्यांच्यावरा लैंगिक छळाचा आरोप झाल्यानंतर त्यांना पायउतार व्हावे लागले. शंकरराव चव्हाण (१९८८ ते १९८९)शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राचे सुपुत्र. २५ जून १९८८ ते २ डिसेंबर १९८९ या काळात राजीव गांधी यांच्या सरकारमध्ये देशाचे अर्थमंत्री होते. मधु दंडवते (१९८९ ते १९९0)मधू दंडवते हे कोकणचे सुपुत्र १९८९ पासून १९९0 या कालावधीत देशाचे अर्थमंत्री होते. राष्ट्रीय जनता दलाच्या व्ही.पी. सिंग यांच्या सरकारमध्ये त्यांनी २ डिसेंबर १९८९ ते १0 नोव्हेंबर १९९0 या कालावधीत अर्थ खात्याची जबाबदारी पार पाडली.यशवंत सिन्हा (१९९0 ते १९९१)चंद्रशेखर यांच्या कॅबिनेटमध्ये यशवंत सिन्हा हे १0 नोव्हेंबर १९९0 पासून २१ जून १९९१ या कालावधीत अर्थमंत्री राहिले. १९६0 पर्यंत ते पाटणा विद्यापीठात राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून शिकवीत होते. वाजपेयी यांच्या सरकारमध्ये मार्च १९८८ ते जुलै २00२ या काळात पुन्हा ते अर्थमंत्री बनले.मनमोहनसिंग (१९९१ ते १९९६)पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये १९९१ मध्ये डॉ. मनमोहनसिंग अर्थमंत्री होते. २१ जून १९९१ ते १६ मे १९९६ आणि नंतर ते स्वत: पंतप्रधान असताना २६ जून २0१२ पासून ३१ जुलै २0१२ या काळात अर्थमंत्री राहिले.जसवंत सिंग (१९९६)अटलबिहारी वाजपेयी यांच्या १३ महिन्यांच्या सरकारमध्ये जसवंतसिंग हे अर्थमंत्री होते. वाजपेयी सरकार पुन्हा सत्तेत आले तेव्हाही तेच अर्थमंत्री बनले. १६ मे १९९६ ते १ जून १९९६ आणि २00२ ते २00४ या काळात ते अर्थमंत्री होते. पी. चिदंबरम (१९९६ ते १९९७)पी. चिदंबरम हे तीन वेळा देशाचे अर्थमंत्री बनले. एच.डी. देवेगौडा यांच्या कॅबिनेटमध्ये १ जून १९९६ ते २१ एप्रिल १९९७, त्यानंतर एल.के. गुजराल यांच्या कॅबिनेटमध्ये १ मे १९९७ ते १९ मार्च १९९८ आणि ३१ जुलै २0१२ ते २६ मे २0१४ या काळात ते अर्थमंत्री होते.इंद्रकुमार गुजराल (१९९७)१९९७ मध्ये पंतप्रधान असताना इंद्रकुमार गुजराल यांनी २१ एप्रिल १९९७ पासून १ मे १९९७ या काळात अर्थमंत्रिपद स्वत:कडे ठेवले होते.अरुण जेटली (२0१४ पासून)विख्यात वकील असलेले अरुण जेटली हे भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये २६ मे २0१४ पासून अर्थमंत्री आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळच्या सहकाऱ्यांमध्ये त्यांची गणना होते.