नवी दिल्ली : सौरऊर्जेच्या प्रकल्पांसाठी सरकार १,५०० कोटी रुपयांच्या निधीची स्थापना करीत आहे. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय सौर मिशनअंतर्गत योजनांसाठी सौर वीजप्रकल्प निर्मात्यांना देण्यात येणारा निधी, त्यामुळे विनाविलंब देता येईल. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सोलर एनर्जी कॉर्पोरेशन आॅफ इंडिया ही सरकारी कंपनी १,५०० कोटी रुपयांच्या सुरक्षा प्रणालीची स्थापना करणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
केंद्राकडून सौर योजनांसाठी १५०० कोटी!
By admin | Updated: August 29, 2016 02:51 IST