आज बैलपोळा, म्हणजेच सर्जा-राजाचा सण
शेतीत यांत्रिकीकरण आल्याने सर्जाराजाचे महत्व कमी झाले
पूर्वी शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात जनावरे होती.
जनावरांच्या संख्येवरून शेतकऱ्यांची श्रीमंती ठरवली जायची.
लग्नकार्य ठरवताना किती जनावरे आहेत, हा प्रश्न विचारण्यात येत होता.
आता ते दिवस राहिले नाहीत. वैरणीचा प्रश्न निर्माण झाल्याने जनावरे पोसणे कठीण झाले.
आज केवळ काहीच शेतकऱ्यांकडे बैलजोड्या शिल्लक असल्याचे दिसते.
मात्र आजही काही भागात मोठ्या उत्साहात बैलपोळा साजरा केला जातो.