Crime News: प्रेम प्रकरणातून युवकाचा खून, गावात कडकडीत बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 12:02 PM2023-02-04T12:02:26+5:302023-02-04T12:02:53+5:30

Crime News: प्रेम प्रकरणातून वाई तालुक्यातील खानापूर येथील मोलमजुरी करणाऱ्या युवकाचा परखंदीत निर्घृण खून करण्यात आला. ही घटना शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली

Murder of a youth due to a love affair, strict closure in the village | Crime News: प्रेम प्रकरणातून युवकाचा खून, गावात कडकडीत बंद

Crime News: प्रेम प्रकरणातून युवकाचा खून, गावात कडकडीत बंद

Next

वाई (सातारा) : प्रेम प्रकरणातून वाई तालुक्यातील खानापूर येथील मोलमजुरी करणाऱ्या युवकाचा परखंदीत निर्घृण खून करण्यात आला. ही घटना शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली. अभिषेक रमेश जाधव असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. 

गावातील लोक सकाळी शेताकडे जात असताना त्यांना मृतदेह आढळून आला. मृतदेहाजवळ असलेल्या कागदपत्राच्या आधारे हा युवक खानापूर येथील अभिषेक जाधव (वय २०) असल्याचे समोर आले. चौकशीत नापूरमधील रहिवासी असलेल्या रहीम नावाच्या युवकाने त्याला नेल्याचे समजले. त्यानंतर मृतदेह आढळून आल्याने संतापाची लाट उसळली. अभिषेक हा मोलमजुरीचे काम करीत होता. त्याच्या पश्चात आई, लहान बहीण आहे. मृतदेह गावात आणला तेव्हा आई व लहान बहिणीच्या हंबरड्याने परिसर गहिवरून गेला.

नातेवाइकांनी दोघांना होते समजावले
अभिषेक जाधव याचे गावातीलच एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. याला त्यांच्या कुटुंबीयांचा विरोध असल्याने त्यांनी दोघांना समजावून सांगितले होते. मात्र, मुलीच्या कुटुंबातील व्यक्तींच्या डोक्यातून राग गेलेला नव्हता. त्यातूनच हा खून झाला असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

Web Title: Murder of a youth due to a love affair, strict closure in the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.