महाराष्ट्र निवडणूक २०१९: 'बंडखोरी नसती तर राज्यात महायुतीच्या ४-५ जागा वाढल्या असत्या'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 02:10 PM2019-10-23T14:10:00+5:302019-10-23T14:13:15+5:30

मुक्ताई नगर शिवसेनेचे बंडखोर उभे राहिले मात्र त्यांच्यावर कारवाई झाली नाही.

Maharashtra Election 2019: 'Had there been no rebellion, the state would have increased 4-5 seats in the Mahayuti' Says Eknath Khadse | महाराष्ट्र निवडणूक २०१९: 'बंडखोरी नसती तर राज्यात महायुतीच्या ४-५ जागा वाढल्या असत्या'

महाराष्ट्र निवडणूक २०१९: 'बंडखोरी नसती तर राज्यात महायुतीच्या ४-५ जागा वाढल्या असत्या'

Next

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये शिवसेना-भाजपा महायुतीला २०० च्या वर जागा मिळणार असा अंदाज आहे. मात्र शिवसेना-भाजपा यांना राज्यात बंडखोरीचा सामना करावा लागला. बंडखोरी नसती तर राज्यात महायुतीच्या ४-५ जागा वाढल्या असत्या असा दावा भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. 

याबाबत बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, महायुतीला २०० च्या वर जागा मिळतील असं भाजपाने याआधीच सांगितले होते. एक्झिट पोलचे आकडेही तसे सांगत आहे. राज्यात महायुतीची सत्ता येणार हे स्पष्ट आहे. मात्र काही ठिकाणी राज्यात बंडखोरीचा फटका बसला नसता तर आणखी जागांमध्ये वाढ झाली असती असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 

तसेच मुक्ताई नगर शिवसेनेचे बंडखोर उभे राहिले मात्र त्यांच्यावर कारवाई झाली नाही. याठिकाणी बंडखोर उभे आहे त्याचे पडसाद अन्य ठिकाणी उमटले असणार, बंडखोरांवर कारवाई होणं गरजेचे होते. अन्य ठिकाणी शिवसेनेने बंडखोरांवर कारवाई केली आहे. मात्र मुक्ताई नगरमध्ये कारवाई करण्यात आली नाही. तरीही रोहिणी खडसे १५ हजार मताधिक्याने निवडून येणार असल्याचं एकनाथ खडसेंनी सांगितले. 

राज्यातील विविध चॅनेल्सने दाखविलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपाला १२०-१४० जागा तर शिवसेनेला ८०-१०० जागा मिळतील असं सांगण्यात आलं आहे. तर विरोधकांना अवघ्या ४०-६० जागा जिंकता येतील असं सांगितले आहे. राज्यातील वातावरण महायुतीच्या बाजूने असल्याचं कल एक्झिट पोलमध्ये दिला आहे. मात्र प्रत्यक्ष निकालात काय होतं यासाठी २४ तारखेची वाट पाहावी लागणार आहे. 

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत भाजपाने १६४ तर शिवसेनेने १२४ जागा लढविल्या आहेत. तर कणकवली, माण या मतदारसंघात शिवसेना-भाजपा एकमेकांसमोर निवडणुका लढवित आहे. त्यामुळे या दोन जागा कोणत्या पक्षाला मिळणार हे पाहणे गरजेचे आहे. महायुतीत शिवसेना किती जागा मिळविणार यावर राज्याचं पुढील राजकारण अवलंबून आहे. आमचं ठरलंय असं म्हणत समसमान फॉर्म्युल्यावर शिवसेना निवडणुकीपूर्वी ठाम होती. मात्र काही तडजोडी करुन पुन्हा युतीत निवडणूक लढविली. राज्यात शिवसेनेचा मुख्यमत्री बसविणार असं उद्धव ठाकरेंनी सांगितले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणच्या बंडखोरांवर शिवसेनेने जाणीवपूर्वक कारवाई केली नाही का? असा प्रश्न उपस्थित होतो. 

महत्वाच्या बातम्या 

भाजपाला शिवसेनेशिवाय राज्य करता येणार नाही; संजय राऊतांचा दावा 

'प्रत्यक्ष निकालात राष्ट्रवादी पहिल्या अथवा दुसऱ्या क्रमांकावर असणार'

मोदी सरकार शेतकऱ्यांना देणार 'दिवाळी गिफ्ट'? आज होणार निर्णय

काँग्रेसचा भाजपाला सूचक इशारा?; प्रवक्ते म्हणतात, 'आदित्य ठाकरेही मुख्यमंत्री होऊ शकतात'

उदयनराजेंना आणखी प्रतिक्षा करावी लागणार; साताऱ्याचा निकाल विलंबाने लागणार

Web Title: Maharashtra Election 2019: 'Had there been no rebellion, the state would have increased 4-5 seats in the Mahayuti' Says Eknath Khadse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.