देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा; नवे सरकार बनेपर्यंत राहणार 'काळजीवाहू'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2019 04:20 PM2019-11-08T16:20:34+5:302019-11-08T18:10:34+5:30

राज्यातील १३ व्या विधानसभेचा कार्यकाळ शनिवारी ९ नोव्हेंबरला संपत आहे.

Big Breaking : Devendra Fadnavis resigns from CM post; Who will form Government in Maharashtra? | देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा; नवे सरकार बनेपर्यंत राहणार 'काळजीवाहू'

देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा; नवे सरकार बनेपर्यंत राहणार 'काळजीवाहू'

Next

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे सोपविला आहे. शिवसेनेने मुख्यमंत्री पदाची अट ठेवल्याने भाजपाला पुन्हा युतीची सत्ता स्थापन करण्यास अडचणी आल्या आहेत. यामुळे उद्या सध्याच्या फडणवीस सरकारची मुदत संपुष्टात येणार असल्याने त्यांनी आज राजीनामा दिला आहे. यानंतर फडणवीस हे पत्रकार परिषद घेणार आहेत. 


राज्यातील १३ व्या विधानसभेचा कार्यकाळ शनिवारी ९ नोव्हेंबरला संपत आहे. विधानसभा बरखास्त होत असताना राज्यातील सरकारचा कार्यकाळही संपुष्टात येतो. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपालांची भेट घेऊन आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. विधानसभा बरखास्त झाल्यानंतर राज्यपाल सरकार स्थापन करण्यासाठी प्रक्रिया सुरु करतील. सर्वात आधी ते सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाला सत्तेचं निमंत्रण देऊ शकतात. भाजपाकडे १०५ आमदारांचे संख्याबळ आहे तर शिवसेनेकडे ५६ आमदारांचे संख्याबळ आहे. या दोन्ही पक्षांनी निवडणुका एकत्र लढल्या होत्या. महायुतीकडे बहुमताचा १४५ आकडा आहे. पण मुख्यमंत्रिपद समसमान वाटप व्हावं या मागणीवर शिवसेना ठाम आहे तर मुख्यमंत्रिपद सोडणार नसल्याची भूमिका भाजपाने घेतली आहे. त्यामुळे राज्यात अभूतपूर्व पेच निर्माण झाला आहे. 


भाजपाचे नेते आणि मंत्री आशिष शेलार, रावसाहेब दानवे राजभवनामध्ये पोहोचले होते. यानंतर काही वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजभवनात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना भेटले. यानंतर त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सोपविला. 

 

...तर शिवसेनेने केंद्रातील सत्तेतून बाहेर पडावे
दरम्यान, सरकार स्थापनेचा तिढा कायम असताना शिवसेनेने आधी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडावे, म्हणजे ते भाजपशिवाय अन्य पक्षांना सोबत घेऊन सरकार बनवण्यासाठी गंभीर आहेत हे लक्षात येईल. तसे झाले तरच आम्ही दिल्लीत श्रेष्ठींशी बोलू असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. गेले १३ दिवस निर्माण झालेल्या पेचप्रसंगानंतर काँग्रेसची ही पहिली भूमिका समोर आली आहे.

 

Web Title: Big Breaking : Devendra Fadnavis resigns from CM post; Who will form Government in Maharashtra?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.