Maharashtra Election 2019 : यवतमाळच्या तीन मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, भाजप आमदाराची बंडखोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 04:22 AM2019-10-11T04:22:58+5:302019-10-11T04:25:04+5:30

२०१४ मध्ये काँग्रेसकडून खेचून घेतलेल्या विधानसभेच्या पाच जागा यावेळी कायम ठेवण्याचे आव्हान भाजपपुढे आहे.

Maharashtra Election 2019: Yavatmal's three ministers win prestige | Maharashtra Election 2019 : यवतमाळच्या तीन मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, भाजप आमदाराची बंडखोरी

Maharashtra Election 2019 : यवतमाळच्या तीन मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, भाजप आमदाराची बंडखोरी

Next

- राजेश निस्ताने

यवतमाळ जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात रंगतदार लढती होत आहे. त्यात भाजपचे मंत्री प्राचार्य डॉ. अशोक उईके, मदन येरावार व संजय राठोड यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
२०१४ मध्ये काँग्रेसकडून खेचून घेतलेल्या विधानसभेच्या पाच जागा यावेळी कायम ठेवण्याचे आव्हान भाजपपुढे आहे. या पाच पैकी आर्णीचे राजू तोडसाम व उमरखेडचे राजेंद्र नजरधने यांचे तिकीट पक्षाने कापले आहे. नजरधनेंनी माघार घेतली असली तरी राजू तोडसाम यांची बंडखोरी कायम आहे. जिल्ह्यात भाजप पेक्षा अधिक शिवसेनेची पक्षबांधणी व ताकद असताना सात पैकी केवळ दिग्रस हा एकच परंपरागत मतदारसंघ सेनेच्या वाट्याला आल्याने तमाम शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट आहे. त्यातूनच वणी, यवतमाळ व उमरखेड मतदारसंघात सेनेत बंडखोरी झाली आहे. मुंबईहून आलेले सेना नेते अनिल देसाई यांनाही ही बंडखोरी शमविता आली नाही. काँग्रेसने उमरखेड, आर्णी व यवतमाळमध्ये भाजपपुढे आव्हान उभे केले आहे. राळेगाव व पुसदमध्ये दुरंगी, यवतमाळ, दिग्रस, उमरखेड, आर्णी येथे तिरंगी तर वणी मतदारसंघात पंचरंगी सामना होण्याची चिन्हे आहेत. भाजपने यावेळी दोन उमेदवार बदलविले तर काँग्रेसने चार मतदारसंघात आपले जुनेच चेहरे कायम ठेवले. बंडखोरी व गटबाजी कुणाच्या पथ्थ्यावर पडते याकडे संपूर्ण जिल्ह्याच्या नजरा लागल्या आहेत.

प्रचारातील प्रमुख मुद्दे
१) भाजपकडून ३७० कलम, हिंदुत्व, सेव्ह मेरीट या सारखे मुद्दे रेटले जात आहे. २) काँग्रेस-राष्टÑवादी बिघडलेले अर्थचक्र, मंदीची लाट, महागाई यावर जोर देते.
३) जिल्ह्यात डबघाईस आलेले उद्योग, बेरोजगारीची समस्या हा मूळ मुद्दा आहे.
४) शेतकऱ्यांची समस्या, शेतमालाला नसलेला भाव हे मुद्दे ग्रामीणमध्ये तापले.

रंगतदार लढती
पुसद विधानसभा मतदारसंघातील लढत ही भाऊबंदकीत होत आहे. भाजपचे आमदार अ‍ॅड. नीलय नाईक आणि राष्टÑवादीचे विद्यमान आमदार मनोहरराव नाईक यांचे पुत्र इंद्रनील नाईक यांच्यात थेट सामना होतो आहे. दोन सख्खे चुलत भाऊ रिंगणात उतरले आहे.
पालकमंत्री यवतमाळ मतदारसंघातून रिंगणात आहेत. त्यांच्यापुढे काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर यांचे आव्हान आहे. येथे शिवसेना बंडखोर संतोष ढवळे यांची उमेदवारी कुणाच्या पथ्यावर पडते हे महत्वाचे ठरते.
एक लाख मतांची आघाडी घेऊन यावेळी निवडून येण्याचे स्वप्न रंगविणाºया महसूल राज्यमंत्री शिवसेनेचे संजय राठोड यांच्यापुढे भाजप बंडखोर माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनी अचानक आव्हान उभे केले आहे. त्यामुळे लाखांवर मतांची आघाडी मिळविण्याचे राठोड यांचे स्वप्न भंगण्याची चिन्हे असून निवडून येण्यासाठी त्यांंचा संघर्ष सुरू आहे.

Web Title: Maharashtra Election 2019: Yavatmal's three ministers win prestige

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.