Tap to Read ➤

वारंवार अडचणी येतात, स्वामींना नवस करायची इच्छा आहे? अशक्यही शक्य होईल

स्मरण करताच हाकेला धावून येत स्वामी समस्येतून मार्ग दाखवतात, अशी अनेकांची श्रद्धा आहे.
एखादी गोष्ट पूर्ण करण्याचे आटोकाट प्रयत्न केले तरी समस्या, अडचणी येतात. अनेक मार्गाने ती गोष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो.
सर्व मार्ग संपले, असे वाटल्यावर अखेरीस भगवंताला शरण जाऊन एखादा नवस करावा, असा विचार मनात येतो. मग आराध्य देवतेकडे मनापासून मागणे मागितले जाते.
स्वामी महाराज इच्छा पूर्ण करतात. मनापासून हाक मारली की, धावून जातात. अडचणींतून सोडवतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
भाविकांवर असीम कृपा, अपार माया करणाऱ्या स्वामी समर्थ महाराजांना नवस करायचा विचार असेल तर तो कसा करावा?
अगदी घरच्या घरी स्वामींना नवस केला जाऊ शकतो. यासाठी मोठी पूजा करावी, होम-हवन करण्याची गरज नाही.
तुम्ही फक्त स्वामींसमोर बसा. घरातील स्वामींची मूर्ती किंवा तसबिरीसमोर दिवा, अगरबत्ती लावा. स्वामींची मनापासून प्रार्थना करा.
स्वामींसमोर हात जोडून तुमचे जे काही मागणे आहे, हे मागा. संकटे, समस्यांची गाऱ्हाणी मांडा. जो नवस बोलायचा आहे, तो बोलून घ्या.
स्वामींना प्रार्थना करायची की, स्वामी समर्थ महाराजा हा नवस आहे, हा लवकरात लवकर पूर्ण करा. स्वामींसमोर नतमस्तक व्हा.
तसेच जे शक्य आहे, ते यथाशक्ती करण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल, असेही वचन द्यावे.
स्वामींकडे मागितलेली गोष्ट पूर्ण झाली, तर नवस फेडण्यासाठी शक्य असेल तर अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे.
महत्त्वाचे म्हणजे एकदा नवस बोलला आणि तो फळला तर जे काही वचन दिले आहे, ते पूर्ण करायला अजिबात विसरू नका.
नवस फेडण्याचा विलंब करू नका. अन्यथा अडचणी, समस्यांना सामोरे जावे लागू शकते. स्वामी दयाळू असले तरी ही गोष्ट चुकवू नका.
नवस साधा सरळ स्वामींच्या समोर बसून हात जोडून बोला. बोलताना नवस पूर्ण झाल्यावर जे करू शकत असाल ते नक्की बोला.
स्वामींची सेवा सुरू ठेवा. सदर माहिती सामान्य गृहीतकांवर आधारित असून, अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
क्लिक करा