प्रमाणापेक्षा जास्त तिखट पाणीपुरी खाल्ल्याने त्याचे काही दुष्परिणाम शरीरावर होतात.
पाणीपुरीचे शौकीन असणाऱ्यांची काही कमी नाही. यात अनेक जण तिखट पाणीपुरी खाण्यावर भर देतात.
तिखट पाणीपुरी खाल्ल्यामुळे पोटात जळजळ, अॅसिडिटी आणि अल्सरचा त्रास होऊ शकतो.
पोटदुखी, उलट्या, पोटात गॅस होणे आणि जुलाब होणे यांसारख्या समस्या हमखास निर्माण होतात.
सतत तिखट खाल्ल्याने चेहऱ्यावरील नैसर्गिक ग्लो निघून जातो. परिणामी चेहऱ्यावर पिंपल्स येतात.
तिखट खाल्यामुळे आतड्यांवर त्याचा परिणाम होतो. ज्यांना इरिटेबल बाउल सिंड्रोम (IBS) आहे त्यांचा त्रास वाढू शकतो.