Next

Hunger Strike : काँग्रेसने संसदेतील चर्चेतून पळ काढला; रावसाहेब दानवेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2018 01:21 PM2018-04-12T13:21:06+5:302018-04-12T13:21:06+5:30

औरंगाबाद : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राचे सर्व दिवस काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांनी गोंधळ घालत कामकाज बंद पडले. सरकार विरोधी पक्षांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार असतानाही त्यांनी चर्चेतून पळ काढला, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केली आहे.