नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात मनसैनिकांचा राडा 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2021 02:24 AM2021-01-06T02:24:01+5:302021-01-06T07:50:02+5:30

Eknath Shinde : वसई-विरार पालिका प्रशासनाने मंगळवारी परिवहन बसेसचे उद्घाटन, लोकार्पण सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमाला नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे व इतर नेते मंडळी हजर असताना, मनसैनिक आक्रमक झाले.

Rada of Mansainiks in the program of Eknath Shinde | नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात मनसैनिकांचा राडा 

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात मनसैनिकांचा राडा 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : वसई-विरार शहर महापालिका प्रशासन आयोजित परिवहन बसेसच्या लोकार्पण सोहळ्याच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहिलेले राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात ‘पालिका आयुक्त आम्हाला वेळ द्या,’ असे ओरडत वसईतील मनसैनिकांनी घोषणाबाजी करीत राडा केला. या वेळी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


वसई-विरार पालिका प्रशासनाने मंगळवारी परिवहन बसेसचे उद्घाटन, लोकार्पण सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमाला नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे व इतर नेते मंडळी हजर असताना, मनसैनिक आक्रमक झाले. त्यातील मनसेच्या दोघा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत राडा केला.
पोलीस आणि शिवसैनिकांनी दोघा मनसे कार्यकर्त्यांना या वेळी चोप देत, कार्यक्रमातून बाहेर काढले. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही मनसे कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात नेले. परिवहन सेवेवरून बविआ-शिवसेना आमने-सामने उभी असताना, मध्येच मनसेने राडा करीत कार्यक्रमाला गालबोट लावले, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून या वेळी उमटली. 


वसई-विरार परिवहन सेवा सुरू करण्यावरून बहुजन विकास आघाडी व शिवसेनेचे राजकारण आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सुरू आहे. लॉकडाऊनच्या काळात परिवहन सेवा पूर्णपणे बंद होती. मात्र, दोन दिवसांपूर्वीच पालिका हद्दीत बविआने उद्घाटन करून बससेवा सुरू केली होती. आता हीच परिवहन सेवा आम्ही सुरू केली असल्याचा दावा करीत, या परिवहन सेवेचा लोकार्पण सोहळा वसई-विरार महापालिकेच्या वतीने मंगळवारी आयोजित केला होता. 

Web Title: Rada of Mansainiks in the program of Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.