‘क्यार’,‘महा’ चक्रीवादळाचा फटका पर्यटनाला; भूकंपाच्या धक्क्यांचाही होतोय परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 11:06 PM2019-11-01T23:06:34+5:302019-11-01T23:06:49+5:30

यंदा केवळ १५ टक्के पर्यटकांनी दिल्या पर्यटनस्थळाला भेटी

'Car', 'Great' cyclone hit tourism; Earthquake shocks are also the result | ‘क्यार’,‘महा’ चक्रीवादळाचा फटका पर्यटनाला; भूकंपाच्या धक्क्यांचाही होतोय परिणाम

‘क्यार’,‘महा’ चक्रीवादळाचा फटका पर्यटनाला; भूकंपाच्या धक्क्यांचाही होतोय परिणाम

Next

हितेन नाईक

पालघर : ‘क्यार’ चक्रीवादळानंतर पुन्हा नव्याने निर्माण झालेल्या ‘महा’ चक्रीवादळासोबतच जिल्ह्यात एकावर एक बसत असलेल्या भूकंपाच्या धक्क्याचा परिणाम पर्यटन व्यवसायावर बसत असून यंदा केवळ १५ टक्के पर्यटकांनी केळवे तसेच इतर पर्यटन स्थळांना भेटी दिल्याने या व्यवसायाचे आर्थिक कंबरडेच मोडले आहे. पर्यटकांच्या मनात वाढत चाललेली ही भीती भविष्यात पर्यटन व्यवसायाला मारक ठरू शकते.

जिल्ह्याला ११० किलोमीटरचा सागरी किनारा लाभला असून रेल्वेची साखळी, चांगले रस्ते अशी उत्कृष्ट वाहतूक व्यवस्था, राहण्याची उत्तम सोय, उत्तम पर्यटन स्थळे आणि प्रदूषणविरहीत समुद्र किनारे असल्याने दरवर्षी पालघर जिल्ह्यातील झाई, बोर्डी, डहाणू, केळवे, जव्हार, अर्नाळा आदी भागात मुंबई, गुजरात राज्यातील हजारो पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. जिल्हा प्रशासन पातळीवरूनही येथे येणाऱ्या पर्यटकांना उत्तम सोयीसुविधा पुरविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत.

नवरात्रोत्सव संपला की कॉर्पोरेट कंपन्यांचे ग्रुप, महिला मंडळे, पुरूष ग्रुप यांची पावले जिल्ह्यातील पर्यटन स्थळाकडे वळतात. तर दिवाळी संपली की आपल्या मुलाबाळांसह शेकडो कुटुंबे केळवे, अर्नाळा, कळंब, डहाणू-बोर्डी आदी भागाला भेट देत असतात.
अरबी समुद्रांतर्गत अचानक झालेल्या बदलांचा मोठा फटका या वर्षीच्या पर्यटन हंगामास बसला आहे. क्यार चक्रीवादळानंतर महा चक्रीवादळ सक्रिय झाल्याने त्याचा परिणाम किनारपट्टी भागात जाणवू लागला आहे. शुक्र वारी सकाळपासूनच समुद्री वातावरणात बदल झाल्याचे दिसून आले. यात लाटांचा वेगही वाढला असून किनाºयावर लाटांचा तडाखा बसत आहे. समुद्र खवळल्याने पाण्याच्या पातळीत वाढ होत समुद्राचे पाणी गावातील घरात शिरू लागले आहे.

तर डहाणू तालुक्यात ११ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या भूकंपाच्या धक्क्याने पंचविशी गाठली असून मागच्या आठवड्यापर्यंत हे धक्के सुरूच आहेत. ४.८ रिष्टर स्केलपर्यंत या भूकंपाने मजल गाठल्याने याचा धसका पर्यटकांच्या मनात घर करून बसला आहे. त्यामुळे एके ठिकाणी कधीही बसणारे भूकंपाचे धक्के, अवेळी कोसळणारा पाऊस, तर दुसरीकडे क्यार आणि महा चक्रीवादळाच्या तडाख्याची भीती पर्यटकांना सतावत आहे. मुंबई, नाशिक, वापी, सुरत आदी भागातील पर्यटक अशा धोकादायक बनू पाहणाºया वातावरणाची चौकशी करून येण्याचे टाळत असल्याचे केळवे बीच पर्यटन महोत्सवाचे अध्यक्ष आशिष पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले. पर्यटकांच्या मनातील भीती दूर सारीत त्यांना विश्वास वाटेल, यासाठी सोयीसुविधा उभारायला हव्यात, अशी मागणी होत आहे.

केळवे बीच पर्यटन महोत्सवाचे आयोजन : जिल्ह्यात हळुहळू कमी होत चाललेला पर्यटन व्यवसाय टिकून रहात पर्यटकांनी अधिकाधिक या भागातील पर्यटन स्थळांना भेटी द्याव्यात म्हणून केळवे येथे केळवे बीच पर्यटन महोत्सवाचे आयोजन ९ नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे. ताजे पापलेट, कोळंबी, सुरमई, बोंबील, उकड हंडी आदी खाद्य पदार्थांची चांगली व्यवस्था ठेवण्यात आल्याचे कार्यवाह संजय घरत यांनी सांगितले.

Web Title: 'Car', 'Great' cyclone hit tourism; Earthquake shocks are also the result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.