ठाण्यातील ज्वेलर्सच्या दुकानातून एक कोटी ३७ लाखांचे दागिने चोरणाऱ्या झारखंडच्या तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 02:51 PM2021-03-31T14:51:36+5:302021-03-31T14:54:02+5:30

ठाण्यातील शिवाईनगर येथील वारीमाता गोल्ड या ज्वेलर्सच्या दुकानातून तब्बल एक कोटी ३७ लाख दोन हजारांचे सोने चांदीचे दागिने लुटणाºया सुलतान शेख (२९, रा. निमाईटोला, झारखंड), अब्दुल हक (३४, रा. उत्तर पियारपूर, झारखंड) आणि आलमगिर शेख (३३, रा. बोलटोला, झारखंड) या तिघांना कासारवडवली पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. याआधी नवी मुंबईच्या एपीएमसी पोलिसांनी याच चोरीतील दोघांना अटक केली होती.

Three arrested in Jharkhand for stealing jewelery worth Rs 1.37 crore from Thane jewelery shop | ठाण्यातील ज्वेलर्सच्या दुकानातून एक कोटी ३७ लाखांचे दागिने चोरणाऱ्या झारखंडच्या तिघांना अटक

कासारवडवली पोलिसांची कारवाई

googlenewsNext
ठळक मुद्दे कासारवडवली पोलिसांची कारवाईमुंबई विमानतळावरुन घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाण्यातील शिवाईनगर येथील वारीमाता गोल्ड या ज्वेलर्सच्या दुकानातून तब्बल एक कोटी ३७ लाख दोन हजारांचे सोने चांदीचे दागिने लुटणाºया सुलतान शेख (२९, रा. निमाईटोला, झारखंड), अब्दुल हक (३४, रा. उत्तर पियारपूर, झारखंड) आणि आलमगिर शेख (३३, रा. बोलटोला, झारखंड) या तिघांना कासारवडवली पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. या तिघांनाही मुंबईतील आंतरराष्टÑीय विमानतळावरुन ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी बुधवारी दिली.
वारीमाता गोल्ड या ज्वेलर्सच्या दुकानाच्या बाजूलाच झारखंडच्या या टोळक्याने फळ विक्रीसाठी दुकानाचा गाळा भाडयाने घेऊन त्याच दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडून या ज्वेलर्सच्या दुकानात शिरकाव केला होता. नंतर गॅस कटरच्या मदतीने दागिन्यांची तिजोरी फोडून १६ ते १७ जानेवारी २०२१ रोजी ही लूटमार करुन पलायन केले होते. वर्तकनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी १७ जानेवारी रोजी गुन्हा दाखल झाला होता. अत्यंत नियोजनबद्धपणे इतक्या मोठया प्रमाणात ही लूट झाल्याने गुन्हे अन्वेषण विभागाकडूनही या प्रकरणाचा समांतर तपास सुरु होता. पोलीस उपायुक्त डॉ. राठोड यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी वागळे इस्टेट परिमंडळातील वर्तकनगर, वागळे इस्टेट, कापूरबावडी आणि कासारवडवली अशा सर्वच पोलीस ठाण्यांना तपासाचे आदेश दिले होते. त्याचअनुषंगाने कासारवडवलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या पथकाकडूनही या प्रकरणाचा तपास सुरु होता. याच चोरीतील संशयित सुलतान शेख याच्यासह तिघे आरोपी हे पटना येथील लोकनायक जयप्रकाश एअरपोर्ट येथून मुंबईतील आंतरराष्टÑीय विमानतळावर ३० मार्च रोजी येणार असल्याची गोपनीय माहिती खैरनार यांना मिळाली होती. त्याच आधारे पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांच्या नेतृत्वाखाली एका पथकाची निर्मिती करण्यात आली. त्यानुसार सापळा लावून या पथकाने मुंबई विमानतळावर मुंबई पोलिसांच्या मदतीने या तिघांनाही ताब्यात घेतले. त्यांचा या ज्वेलर्सच्या चोरीमध्ये सक्रीय सहभाग असल्याची बाब चौकशीत समोर आली. विशेष म्हणजे ते पुणे परिसरातील आणखी एक ज्वेलर्सचे दुकान फोडून रात्रीची चोरी करण्यासाठीच ते आल्याचीही त्यांनी कबूली दिली.
* पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, अपर पोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक खैरनार, रणवरे, अविनाश काळदाते, वैभव धुमाळ, सहायक पोलीस निरीक्षक शहादेव पालवे आणि सागर जाधव आदींच्या पथकाने हा यशस्वी तपास केला.
* याआधी नवी मुंबईच्या एपीएमसी पोलिसांनी याच चोरीतील दोघांना अटक केली होती. त्यांना वर्तकनगर पोलिसांच्या स्वाधीन केले होते. आता अटक केलेले तिघे या चोरीचे सूत्रधार असल्याची माहिती उपायुक्त डॉ. राठोड यांनी दिली.                                                                                 

Web Title: Three arrested in Jharkhand for stealing jewelery worth Rs 1.37 crore from Thane jewelery shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.