मीरा भाईंदर महापालिकेकडून प्रामाणिक कर दात्यांची थट्टा, थकबाकीदारांना ७५ टक्के व्याज माफ 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 03:45 PM2021-02-24T15:45:58+5:302021-02-24T15:46:23+5:30

Mira Bhayander Municipal Corporation : सवलतीच्या अपेक्षेने मोठ्या संख्येने प्रामाणिक करदात्यानी मालमत्ता कर भरला. परंतु आजतागायत सत्ताधारी भाजपा व प्रशासनाकडून प्रामाणिक करदात्यांना कोणतीच सवलत दिली गेली नाही. 

Mira Bhayander Municipal Corporation and taxpayers | मीरा भाईंदर महापालिकेकडून प्रामाणिक कर दात्यांची थट्टा, थकबाकीदारांना ७५ टक्के व्याज माफ 

मीरा भाईंदर महापालिकेकडून प्रामाणिक कर दात्यांची थट्टा, थकबाकीदारांना ७५ टक्के व्याज माफ 

Next

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेने प्रामाणिक करदात्यांना कोरोना संसर्गाच्या अडचणीच्या काळात कोणतीच सवलत - सूट दिली नसली तरी वर्षा न वर्ष कर न भरणाऱ्या थकबाकीदारांना मात्र कोरोना लॉकडाऊनमुळे सवलतीचा हवाला देऊन तब्बल ७५ टक्के व्याज माफ करण्याचा निर्णय अभय योजनेच्या नावाखाली अमलात आणला आहे. पालिकेच्या या थकबाकीदारांना फायदा करून देण्याच्या प्रकारा मुळे प्रामाणिकपणे नियमित कर भरणाऱ्या नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. 

कोरोना संसर्गाच्या काळात गेल्या वर्षी सर्वत्र लॉकडाऊन असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता नोकरी - व्यवसाय ठप्प होते. त्यावेळी महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता कर ऑक्टोबर २०२० भरल्यास निवासी व वाणिज्य वापरातील मालमत्ता ना ५० टक्के सवलत देण्याचा ठराव केला होता. त्याच वेळी थकबाकीदारांचे व्याज सुद्धा १०० टक्के माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 

सवलतीच्या अपेक्षेने मोठ्या संख्येने प्रामाणिक करदात्यानी मालमत्ता कर भरला. परंतु आजतागायत सत्ताधारी भाजपा व प्रशासनाकडून प्रामाणिक करदात्यांना कोणतीच सवलत दिली गेली नाही. एकीकडे दरवर्षी नियमितपणे कर भरणाऱ्या नागरिकांना कोणतीच सवलत न देताना महापालिकेने आता अभय योजना अमलात आणून थकबाकीदारांना मात्र थकीत व्याजावर तब्बल ७५ टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करण्यापासून कठोर कारवाई करण्याऐवजी त्यांच्यावर सवलतीचा वर्षाव केला जात आहे. त्यामुळे नियमित कर न भरणाऱ्या थकबाकीदारांना व्याजाची केवळ २५ टक्केच रक्कम भरावी लागणार आहे. 

मालमत्ता कर थकबाकीदारांवर कृपादृष्टी करत महापालिकेने २५ फेब्रुवारी ते १५  मार्च या १९ दिवसांच्या कालावधीसाठी ही अभय योजना राबवली आहे. या कालावधीत मालमत्ता कराच्या रकमेसह आकारण्यात आलेल्या व्याजाची २५ टक्के रक्कम थकबाकीदारांचे भरल्यास त्याला ७५ टक्के व्याजाच्या रकमेत माफी मिळणार आहे. 

मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील मालमत्ता कर थकबाकीदारांना दिलासा देण्याच्या दृष्टीने अभय योजने अंतर्गतव्याजाची  ७५ टक्के रक्कम माफ करण्याचा निर्णय प्रशासनाकडून  घेण्यात आला आहे. यासाठी पालिकेकडून १९ दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. या कालावधीत नागरिकांनी मालमत्ता कर व थकीत व्याजा पैकीची केवळ २५ टक्के रक्कम भरल्यास उर्वरित ७५ टक्के व्याज पालिका माफ करणार आहे. 
 

Web Title: Mira Bhayander Municipal Corporation and taxpayers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.