Mansukh Hiren Murder Case: मनसुख प्रकरणात एटीएसची प्रतिष्ठा पणाला!

By जितेंद्र कालेकर | Published: March 21, 2021 10:36 PM2021-03-21T22:36:53+5:302021-03-22T20:38:04+5:30

मनसुख हिरेन कथित हत्या प्रकरणात राज्य दहशतवादविरोधी पथकाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळेच या प्रकरणाचा तपासही राष्टÑीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) जाऊ नये म्हणून हालचालींना वेग आला आहे.

Mansukh Hiren Murder Case: ATS's reputation tarnished in Mansukh case! | Mansukh Hiren Murder Case: मनसुख प्रकरणात एटीएसची प्रतिष्ठा पणाला!

एनआयएकडे खूनाचा तपास जाऊ नये म्हणून हालचालींना वेग

Next
ठळक मुद्दे एनआयएकडे खूनाचा तपास जाऊ नये म्हणून हालचालींना वेग

जितेंद्र कालेकर

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: मनसुख हिरेन कथित हत्या प्रकरणात राज्य दहशतवादविरोधी पथकाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळेच या प्रकरणाचा तपासही राष्टÑीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) जाऊ नये म्हणून हालचालींना वेग आला आहे. या खूनातील पाळेमुळे शोधून काढण्याचे आदेश एटीएसचे प्रमुख जयजित सिंग यांनी रविवारी एटीएसच्या पथकाला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
याच पार्श्वभूमीवर या खूनाच्या कटातील दोन आरोपींना अतिरिक्त पोलीस आयुक्त शिवदीप लांडे यांच्या पथकाने अटक केली. एकीकडे एनआयएने मुंबईतील अंटालिया इमारतीजवळ मिळालेल्या स्फोटकांच्या कारच्या गुन्हयात मुंबईच्या गुन्हे गुप्त वार्ता विभागाचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक केली. पाच कारही जप्त केल्या. पाच लाखांपेक्षा अधिक रोकडही जप्त केली. त्यापाठोपाठ या प्रकरणामुळे मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचीही राज्य सरकारला उचलबांगडी करावी लागली. त्यानंतर मनसुख यांच्या हत्येतही वाझे यांचा सहभाग होता किंवा कसे? याचाही तपास एनआयएच्या अधिकाऱ्यांकडून सुरु झाला होता. त्याचा घटनाक्रमही एनआयएच्या अधिकाऱ्यांनी जाणून घेण्यास सुरुवात केली होती. इकडे एटीएसच्या अधिकाºयांकडे काहीच हाती लागत नसल्यामुळे स्फोटकांच्या तपासाबरोबरच हाही तपास एनआयएकडे जातो की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तोपर्यंत एनआयए हा तपास घेत असल्याचे वृत्तही आले. अखेर राज्याचे एटीएस प्रमुख जयजित सिंग यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त शिवदीप लांडे आणि उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्यात शुक्रवारी झालेल्या बैठकीमध्ये या प्रकरणाचा कसून तपास करण्याचे आदेश देण्यात आले. गेली तीन दिवस हे अधिकारी ठाण्यात तळ ठोकून होते. अखेर या प्रकरणाचा काही अंशी छडा लावण्यात यश आले. त्यातील दोघांना रविवारी अटक करण्यात आली. आता हा तपास काही प्रमाणातच बाकी असल्यामुळे तो एटीएसकडेच ठेवण्यात यावा, त्याचवेळी एनआयएला यासंदर्भात लागणारे कोणतेही सहकार्य एटीएसकडून केले जाईल, असेही बोलले जाते. त्यामुळे संपूर्ण प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या प्रकरणाचा आणखी सखोल आणि चांगल्या प्रकारे तपास करण्याचे आदेश जयजित सिंग यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

‘अति संवेदनशील मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात एटीएसच्या पथकाला यश आले आहे. एटीसच्या सर्व सहकाºयांना मनापासून सॅल्यूट आहे. आतापर्यंतच्या पोलीस सेवेच्या करियरमधील सर्वात अवघड केसपैकी ही एक केस आहे.’
शिवदीप लांडे, अतिरिक्त पोलीस आयुक्त, एटीएस
 

 

 

Web Title: Mansukh Hiren Murder Case: ATS's reputation tarnished in Mansukh case!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.