गड- किल्ल्यांना हात लावाल तर...; राज ठाकरेंचा सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2019 08:45 PM2019-09-07T20:45:31+5:302019-09-07T20:51:38+5:30

गड-किल्ले भाड्याने देण्याच्या धोरणावर राज ठाकरेंनी किल्ल्यांना हात लावायची हिंमत देखील करू नका

If you touch the fortresses...; Raj Thackeray's warning to the government | गड- किल्ल्यांना हात लावाल तर...; राज ठाकरेंचा सरकारला इशारा

गड- किल्ल्यांना हात लावाल तर...; राज ठाकरेंचा सरकारला इशारा

googlenewsNext

डोंबिवली: छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेले ऐतिहासिक गडकिल्ले हॉटेल आणि लग्नसमारंभासाठी राज्य सरकार भाड्याने उपलब्ध करुन देण्याच्या धोरणावर सर्वत्र राज्यातून सरकारवर टीका होत असतानाच राज ठाकरे यांनी देखील आज( ७ सप्टेंबर) राज्य सरकारचा या धोरणावर निशाना साधला आहे.

गड-किल्ले भाड्याने देण्याच्या धोरणावर राज ठाकरेंनी  किल्ल्यांना हात लावायची हिंमत देखील करू नका, कारण महाराष्ट्रमधील इतिहासप्रेमी व शिवप्रेमी कधीच मान्य करणार नाही. त्यामुळे या निर्णयाचे परिणाम सरकारला भोगावे लागतील असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला. त्याचप्रमाणे महाराष्ट्राला इतिहास लाभला आहे. मात्र सरकारला याचं काही देणंघेणं नसल्याचे म्हणत हा निर्णय केवळ मूर्खपणाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच सरकारला जर उत्पन्नच हवे असेल तर मंत्र्यांचे बंगले भाड्याने द्यावे असे राज ठाकरे यांनी राज्य सरकारला सांगितले. राज ठाकरे सध्या डोंबिवली दौऱ्यावर असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेले ऐतिहासिक गडकिल्ले हॉटेल आणि लग्नसमारंभासाठी राज्य सरकार भाड्याने उपलब्ध करून देणार आहे. हेरिटेज टुरिझमला चालना देण्यासाठी एमटीडीसीने राज्यातील 25 किल्ल्यांची निवड केली आहे. त्यामुळे हे किल्ले 50 ते 60 वर्ष भाडेतत्वावर भाड्याने देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती समोर आल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकावर मोठ्या प्रमाणात टीका केली होती.

तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणारे किल्ले सोडून, इतर किल्ल्यांच्या विकासाचे राज्य सरकारचे धोरण आहे. पुरातत्व विभागाकडे असलेले किल्ले वगळता, राज्यात अनेक गड, किल्ले दुर्लक्षित आहेत. या किल्ल्यांचे जतन व्हावे यासाठी यासाठी गुंतवणूकदारांची मते आजमावली जातील. त्यानंतरच धोरण ठरविले जाईल. मात्र, हे किल्ले देखील लग्नासाठी भाड्याने दिले जाणार नाहीत, अशी स्पष्टोक्ती पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली होती.

Web Title: If you touch the fortresses...; Raj Thackeray's warning to the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.