पर्यवेक्षकाच्या चुकीमुळे आयटीआयच्या ३० विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 07:06 PM2020-01-15T19:06:49+5:302020-01-15T19:07:18+5:30

मनविसेच्या दणक्याने कॉलेज प्रशासन ताळ्यावर, पुनर्मूल्यांकन करून विद्यार्थ्यांना न्याय मिळणार

Fear of waste 30 years of ITI students because of supervisor's fault | पर्यवेक्षकाच्या चुकीमुळे आयटीआयच्या ३० विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती

पर्यवेक्षकाच्या चुकीमुळे आयटीआयच्या ३० विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती

Next

ठाणे- वागळे इस्टेट येथील आयटीआय परीक्षेदरम्यान चुकीचे मार्गदर्शन केल्याने एकाचवेळी ३० विद्यार्थ्यांना शून्य गुण देण्यात आले. त्यामुळे अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती होती. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने तात्काळ आयटीआय महाविद्यालयावर धडक देत प्रशासनाला धारेवर धरले. त्यामुळे महाविद्यालय प्रशासन ताळ्यावर आले असून त्यांनी विद्यार्थ्यांच्या गुणाचे पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला आहे. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही. याबाबत महाविद्यालय प्रशासन काळजी घेणार असून या प्रकाराला जबाबदार शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा अर्थात आयटीआयच्या माध्यमातून जुलै २०१९ मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल ८ डिसेंबर रोजी ऑनलाईन घोषित करण्यात आला. प्रथम वर्ष वर्गातील विद्यार्थ्यांच्या या वार्षिक परीक्षेत टर्नर व फिटर प्रवर्गातील तब्बल ३४ जणांना शून्य गुण देण्यात आले. याबाबत विद्यार्थ्यांनी महाविद्यालय प्रशासनाशी संपर्क साधला. तेव्हा परीक्षेदरम्यान वर्गात पर्यवेक्षक असलेल्या मुरलीधर सरवदे या शिक्षकाने उत्तरपत्रिकेवर लिहिली जाणारी माहिती चुकीची सांगितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यामुळे धास्तावलेल्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडे धाव घेतली.

मनविसेचे अध्यक्ष संदीप पाचंगे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे शहर अध्यक्ष किरण पाटील, सचिव सचिन सरोदे यांनी महाविद्यालय प्रशासनाची भेट घेतली. त्यांना धारेवर धरत जाब विचारला. प्रशासनानेही मनविसेच्या पदाधिकाऱ्यांची बाजू ऐकून घेत या प्रकरणी आयटीआयचे प्राचार्य एस. एम. अंबाळकर लेखी निवेदन दिले. वरिष्ठ पातळीवर याबाबत दखल घेऊन कार्यवाही करण्याचे आदेश दिले. यावेळी उप विभाग अध्यक्ष विनोद भूवड, मनविसे उप विभाग अध्यक्ष गणेश शेलार, प्रसाद होडे, शाखा अध्यक्ष संदीप पवार, उप शाखा अध्यक्ष प्रवीण जाधव व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
००

Web Title: Fear of waste 30 years of ITI students because of supervisor's fault

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.