मीरा-भाईंदरमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवण्याचा भाजपाचा डाव; शिवसेनेने दिला इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 07:43 PM2020-02-19T19:43:23+5:302020-02-19T19:44:35+5:30

महाराजांचा काशिमीरा येथील अश्वारूढ पुतळा मेट्रोच्या कामामुळे घोडबंदर येथे हलवण्यात येण्याचा विचार व हालचाली सत्ताधारी भाजपा करत असल्याचे बोलले जातेय.

BJP' Wants remove the statue of Chhatrapati Shivaji Maharaj in Mira-Bhayander; Shiv Sena allegation | मीरा-भाईंदरमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवण्याचा भाजपाचा डाव; शिवसेनेने दिला इशारा 

मीरा-भाईंदरमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवण्याचा भाजपाचा डाव; शिवसेनेने दिला इशारा 

Next

मीरारोड - मीरा भाईंदर शहराचे प्रवेशद्वार असलेल्या काशीमीरा नाका येथील सर्वांचे आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा हटवण्याचा घाट सत्ताधारी भाजपाने घातल्याच्या चर्चेमुळे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज शिवजयंती दिवशी आयुक्तांची भेट घेतली. महाराजांचा पुतळा हटवण्याचे मनसुबे कोणत्याही स्थितीत शिवसेना हाणून पाडेल असा इशारा देतानाच सदर पुतळयाच्या चौथऱ्याची उंची वाढवून परिसर सुशोभित करण्याची मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केली.

आयुक्त चंद्रकांत डांगे यांची आज आ. सरनाईक सह विरोध पक्षनेता प्रविण पाटील, सभापती तारा घरत, गटनेता हरिश्चंद्र आमगावकर, नगरसेविका निलम ढवण, राजु भोईर, स्नेहा पांडे, संध्या पाटील, वंदना पाटील ,कुसूम गुप्ता ,दिनेश नलावडे, अर्चना कदम , कमलेश भोईर , दिप्ती भट, भावना भोईर, शर्मिला बगाजी, हेलन गोविंद तसेच पदाधिकारी प्रभाकर म्हात्रे, स्नेहल सावंत, विक्र म प्रतापिसंग , शुभांगी कोटीयन, पप्पु भिसे, श्रेया साळवी आदी पदाधिकारी उपस्थित होते. नवनियुक्त आयुक्तांचे स्वागत करुन विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

महाराजांचा काशिमीरा येथील अश्वारूढ पुतळा मेट्रोच्या कामामुळे घोडबंदर येथे हलवण्यात येण्याचा विचार व हालचाली सत्ताधारी भाजपा करत असल्याचे बोलले जातेय. मात्र महाराजांचा काशीमीरा येथील पुतळा कुठल्याही परिस्थितीत तेथून स्थलांतरित करण्याचा विचार कुणीही करू नये. असा विचार सुद्धा केला तर त्याला शिवसेनेच्या रुद्रावताराला सामोरे जावे लागेल असा इशारा सरनाईक यांनी दिला.

काशिमीरा नाका येथून शहरात मेट्रो येणार आहे. मेट्रो व उन्नत मार्गाचे काम सुरु आहे. याठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तेथेच कायम ठेवावा व महाराजांच्या पुतळ्याची उंची किमान २५ फुटांनी वाढवावी. पुतळ्याची उंची वाढवून त्याचे सुशोभिकरण करावे. शहरातून कुठूनही हा पुतळा दिसला पाहिजे. घोडबंदर किल्ला सुशोभीकरण करत असताना किल्ल्यात महाराजांचा नवीन पुतळा बसवावा असे सरनाईक यांनी सांगीतले.

Web Title: BJP' Wants remove the statue of Chhatrapati Shivaji Maharaj in Mira-Bhayander; Shiv Sena allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.