शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे महापालिकेने काढल्या १० दिवसांत तब्बल १५० निविदा; आचारसंहितेआधी धावपळ; अधिकाऱ्यांना रात्री १० पर्यंत कामास जुंपले

By अजित मांडके | Updated: October 16, 2024 14:45 IST

मंगळवारी दुपारपासून आचारसंहिता लागण्याच्या दिवशी सकाळीच निविदा प्रक्रिया राबविण्याची धावपळ पालिकेत सुरू होती.

ठाणे : ठाणे पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असतानाही गेल्या दहा दिवसांत गटार, पायवाटा, शौचालये बांधणे, रस्ते दुरुस्ती, समाजमंदिर आदींसह इतर कामांच्या १५० हून अधिक निविदा मागविल्याची माहिती आहे. मंगळवारी दुपारपासून आचारसंहिता लागण्याच्या दिवशी सकाळीच निविदा प्रक्रिया राबविण्याची धावपळ पालिकेत सुरू होती. 

पालिकेची आर्थिक स्थिती ढासळली आहे. पालिकेवर १२०० कोटींच्या आसपास दायित्व आहे. आधीच्या कामांचे ठेकेदारांचे ३०० कोटींच्या आसपास देणी बाकी आहेत.  शासनाच्या निधीवरच पालिकेत विकासकामे सुरू आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी पक्षातील माजी नगरसेवकांना  खुश करण्याचे काम शासनाकडून येणाऱ्या आदेशाच्या माध्यमातून केले. निवडणुकीचे बिगुल १२ ते १५ ऑक्टोबरदरम्यान घोषित होणार हे लक्षात घेऊन शासनाकडून १४ ऑक्टोबरच्या सायंकाळपर्यंत पालिकेकडे कामांचे आदेश प्राप्त झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

१० व ११ ऑक्टोबरला ५५ निविदा प्रसिद्ध यापूर्वी एखाद्या कामाचे राज्य शासनाकडून आदेश आल्यानंतरही त्या कामाची फाईल तयार होऊन निविदा प्रक्रिया अंतिम करण्यासाठी साधारण दोन ते तीन महिन्यांचा कालावधी जात होता. परंतु मागील १५ दिवसांत आलेल्या शासन आदेशांची तत्काळ अंमलबजावणी करून त्या कामांच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. गेल्या १० दिवसांत तब्बल १५० हून अधिक निविदा मागवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. १० आणि ११ ऑक्टोबर या दोन दिवसांतच ५५ निविदा मागवण्यात आल्या. पालिकेतील अधिकारी या कामांसाठी सकाळपासून रात्री १० वाजेपर्यंत कामांत जुंपले होते. 

अधिकाऱ्याने दिवसभरात केल्या एक हजार सह्यासार्वजनिक बांधकाम विभाग हा महत्त्वाचा मानला जातो. पालिकेतील या विभागातील एका अधिकाऱ्याने एका दिवसात तब्बल एक हजाराच्या आसपास प्रस्तावांवर सह्या केल्या. मागील पाच ते सात दिवसांत रोजच्या रोज ५०० ते ७०० प्रस्तावांवर सह्या केल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. १५ ऑक्टोबरला सकाळच्या सत्रात या अधिकाऱ्याच्या टेबलावर १५० च्या आसपास प्रस्ताव सहीसाठी प्रलंबित होते.

निविदा काढल्या, बिलांचे काय?विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी पालिकेने काढलेल्या १५० निविदांची कामे आचारसंहितेनंतर सुरू होतील. परंतु काम केल्यानंतर ठेकेदारांची बिले निघणार का, असा सवाल विचारला जात आहे. शासनाकडून कामांना निधी मंजूर झाला तरी १०० टक्के निधी अद्याप प्राप्त झालेला नाही. त्यामुळे पुन्हा सत्ता आली तर उर्वरित निधी मिळण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका