अभिमन्यू आणि लतिकाच्या नात्याविषयी कळणार अभिच्या घरातल्यांना, काय असणार त्यांची प्रतिक्रिया?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:08 PM2021-06-22T16:08:28+5:302021-06-22T16:09:41+5:30

सुंदरा मनामध्ये भरली मालिकेमध्ये लतिका आणि अभीच्या लग्नाचे सत्य कामिनी सगळ्यांसमोर आणणार आहे.

vat purnima celebration in raja rani chi ga jodi and sundara manamadhe bharli | अभिमन्यू आणि लतिकाच्या नात्याविषयी कळणार अभिच्या घरातल्यांना, काय असणार त्यांची प्रतिक्रिया?

अभिमन्यू आणि लतिकाच्या नात्याविषयी कळणार अभिच्या घरातल्यांना, काय असणार त्यांची प्रतिक्रिया?

googlenewsNext
ठळक मुद्देबापूंचे पैसे मिळाल्यावर अभी लतिकाला बापूंना साभार परत करणार हे मात्र घरातील कोणालाच माहिती नाही. अभिमन्यू आणि लतिकाने हे सत्य सगळ्यांपासून लपवून ठेवले.

ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस “वटपौर्णिमा” म्हणून साजरा केला जातो. सौभाग्याचं प्रतीक आणि सौभाग्यवतीचे फणी करंडा, काळी पोत, हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार तिथे अर्पण करतात. वडाला पाच प्रदक्षिणा मारून सूत गुंडाळतात. मनोभावे वटवृक्ष राजाचे पूजन करतात. हे व्रत सुवासिनी आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात. कलर्स मराठीवरील राजा रानीची गं जोडी आणि सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेमध्ये संजू आणि लतिका वटपौर्णिमा साजरी करणार आहेत. 

संजूची वटपौर्णिमा जरा आगळीवेगळी असणार आहे. नोकरीचं आणि घराचं कर्तव्य संजू पार पाडताना दिसणार आहे. यामध्ये तिला रणजीतची खंबीर साथ देखील मिळणार आहे. तर सुंदरा मनामध्ये भरली मालिकेमध्ये लतिका आणि अभीच्या लग्नाचे सत्य कामिनी सगळ्यांसमोर आणणार आहे. यानंतर दोघांचे नाते कुठलं नवं वळण घेणार? लतिका आणि अभी कसे या घटनेला सामोरे जाणार? घरच्यांना कसे सांभाळणार? हे पाहाणे इंटरेस्टिंग असणार आहे.

राजा रानीची जोडी मालिकेमध्ये एक नवा अध्याय सुरू झाला आहे. संजुने आता रणजीतचे स्वप्न पूर्ण केले आहे. पोलीस झाल्यापासून तिच्या आयुष्यात बरेच बदल झाले आहेत. पण संजू घर आणि नोकरी या दोन्ही जबाबदार्‍या उत्तमरीत्या पार पाडताना दिसते आहे. राजश्री आणि अपर्णा दोघी मिळून संजूसाठी काही ना काही अडचणी निर्माण करण्याचा सतत प्रयत्न देखील करत आहेत. पण त्यांच्या सगळ्या कारस्थानांना संजू उत्तर देत आहे. याच सगळ्यामध्ये आता अजून एक भर म्हणजे गुलाब भोसले. गुलाब संजूच्या पहिल्या दिवसापासून विरोधातच आहे. त्यामुळे संजीवनीची वटपौर्णिमेची पूजा कशी पूर्ण नाही होणार याच्या प्रयत्नात गुलाब आहे तर दुसरीकडे कुसुमावतीला देखील संजूने वटपौर्णिमाची पूजा करणार असे वचन दिले आहे. रणजीतच्या साथीने संजू ही पूजा कशी पार पाडणार हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.

 अभि–लतीचे लग्न कोणत्या परिस्थितीत झाले हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण बापूंचे पैसे मिळाल्यावर अभी लतिकाला बापूंना साभार परत करणार हे मात्र घरातील कोणालाच माहिती नाही. अभिमन्यू आणि लतिकाने हे सत्य सगळ्यांपासून लपवून ठेवले. आता मात्र लतिका निर्णयावर पोहचली आहे की, ती त्यांच्या नात्याबद्दल अजून लपवू शकणार नाही आणि सगळ्यांना सांगणार. कामिनीला मात्र हे सत्य माहिती आहे आणि ती वटपौर्णिमेच्या दिवशी लतिका आणि अभिच्या घरच्यांसमोर ही गोष्ट उघडकीस आणणार आहे.

Web Title: vat purnima celebration in raja rani chi ga jodi and sundara manamadhe bharli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.