स्टार प्रवाहच्या ‘शतदा प्रेम करावे’ या मालिकेला मिळणार हे वळण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2018 08:39 AM2018-06-15T08:39:11+5:302018-06-15T14:09:11+5:30
शतदा प्रेम करावे ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी या मालिकेला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे. ...
श दा प्रेम करावे ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी या मालिकेला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना भावत असल्याचे प्रेक्षक सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत आहेत. अल्लड प्रेमाची अबोल गोष्ट शतदा प्रेम करावे या मालिकेत उलगडली गेली आहे. त्यामुळेच ही प्रेमकथा प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे. या मालिकेत अभिजीत उन्मेषच्या तर ज्ञानदा रामतीर्थकर आपल्याला सायलीच्या भूमिकेत दिसत आहे. मालिका सुरू झाली त्यावेळी स्नेहा शहा सायलीची भूमिका साकारत होती. पण काही कारणाने तिला या मालिकेत काम करणे शक्य नव्हते. त्यामुळे तिची जागा अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर घेतली. या मालिकेद्वारे ज्ञानदाने स्टार प्रवाहवर पदार्पण केले होते. ज्ञानदाला अल्पावधीतच प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळत आहे. तसेच प्रेक्षकांना अभिजीत आणि ज्ञानदामधील केमिस्ट्री देखील आवडत असल्याचे ते आवर्जून सांगत आहेत. शतदा प्रेम करावे मालिकेच्या आगामी भागामध्ये अनेक ट्वीस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
'शतदा प्रेम करावे' या मालिकेत सायली आणि उन्मेषच्या नात्यात रोहनच्या रूपाने एक अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे सायली आणि रोहनचे होणारे लग्न उन्मेष थांबवू शकेल का याची उत्सुकता निर्माण झाली आहे. सायलीला मिळवण्यासाठी रोहन कोणत्याही थराला जायला तयार आहे. म्हणूनच आपल्याबरोबर लग्न न केल्यास उन्मेषला उद्ध्वस्त करण्याची धमकी रोहन सायलीला देणार आहे. सायली घाबरून रोहनबरोबर लग्न करण्यास तयार होणार आहे. मात्र, सायली आपल्याला का सोडून गेली, याचं कारण उन्मेषला कळत नाहीये. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या उन्मेषला खरं कारण कळेल का आणि सायली-रोहनचं लग्न तो थांबवू शकेल का, या प्रश्नाचे उत्तर प्रेक्षकांना महाएपिसोडमध्ये मिळणार आहे. हा एपिसोड प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे.
'शतदा प्रेम करावे' ही मालिका आता चांगलीच इंटरेस्टिंग बनली आहे. या मालिकेला देण्यात आलेला हा ट्विस्ट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी या मालिकेच्या टीमला खात्री आहे.
Also Read : स्टार प्रवाहवरील 'शतदा प्रेम करावे'च्या सेटवर आयोजित करण्यात आली इफ्तारची मेजवानी
'शतदा प्रेम करावे' या मालिकेत सायली आणि उन्मेषच्या नात्यात रोहनच्या रूपाने एक अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे सायली आणि रोहनचे होणारे लग्न उन्मेष थांबवू शकेल का याची उत्सुकता निर्माण झाली आहे. सायलीला मिळवण्यासाठी रोहन कोणत्याही थराला जायला तयार आहे. म्हणूनच आपल्याबरोबर लग्न न केल्यास उन्मेषला उद्ध्वस्त करण्याची धमकी रोहन सायलीला देणार आहे. सायली घाबरून रोहनबरोबर लग्न करण्यास तयार होणार आहे. मात्र, सायली आपल्याला का सोडून गेली, याचं कारण उन्मेषला कळत नाहीये. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या उन्मेषला खरं कारण कळेल का आणि सायली-रोहनचं लग्न तो थांबवू शकेल का, या प्रश्नाचे उत्तर प्रेक्षकांना महाएपिसोडमध्ये मिळणार आहे. हा एपिसोड प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे.
'शतदा प्रेम करावे' ही मालिका आता चांगलीच इंटरेस्टिंग बनली आहे. या मालिकेला देण्यात आलेला हा ट्विस्ट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी या मालिकेच्या टीमला खात्री आहे.
Also Read : स्टार प्रवाहवरील 'शतदा प्रेम करावे'च्या सेटवर आयोजित करण्यात आली इफ्तारची मेजवानी