पहिल्यांदाच तेजश्री प्रधान म्हणाली आयुष्यात जे काही घडले ते बदलू शकत नाही पण..

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 12:40 PM2021-05-12T12:40:51+5:302021-05-12T12:46:33+5:30

तेजश्री प्रधानच्या आयुष्यात अनेक चढ उतार आले आहेत. तिच्या आयुष्यात जे काही घडले हे सा-यांनाच माहिती आहे. कोणापासून ते लपून राहिलले नाही.

Tejashivin pradhan shares positive aspects of her Personal Life for the very first time | पहिल्यांदाच तेजश्री प्रधान म्हणाली आयुष्यात जे काही घडले ते बदलू शकत नाही पण..

पहिल्यांदाच तेजश्री प्रधान म्हणाली आयुष्यात जे काही घडले ते बदलू शकत नाही पण..

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तेजश्री प्रधान घराघरातील रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. आपल्या भूमिकांनी तिने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. छोट्या पडद्यावरच नाही तर रुपेरी पडद्यावरही तेजश्रीने आपल्या अभिनय कौशल्याची झलक दाखवून दिली आहे. विविध चित्रपटातील भूमिका रसिकांना भावल्या आहेत.

छोटा पडदा आणि मोठ्या पडद्यानंतर हिंदी तसंच मराठी रंगभूमीवरही तेजश्रीने छाप पाडली आहे. हिंदी असो किंवा मराठी नाट्य रसिक तेजश्रीच्या अभिनयावर फिदा आहेत. विविध नाटकात तेजश्रीने दमदार भूमिका साकारल्या आहेत. तेजश्री सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते.

 

फेसबुक, ट्विटरच्या माध्यमातून आपले विचार तसंच स्वतःचे फोटो ती आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. नुकताच तेजश्रीचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ एका कार्यक्रमात तिने हजेरी लावली तेव्हा तिच्या आयुष्यावर बोलताना दिसते. 


तेजश्रीच्या आयुष्यात अनेक चढ उतार आले आहेत. तिच्या आयुष्यात जे काही घडले हे सा-यांनाच माहिती आहे. कोणापासून ते लपून राहिलले नाही. अनेकदा नातेवाईक तेजश्रीच्या आईलाही वेगवेगळे प्रश्न विचारतात की, तुम्ही इतकं देवधर्माचं करतात मग तेजुच्या आयुष्यात असे काय घडावं ? यावर अतिशय संयमाने तेजश्रीची आई उत्तर देते की, तिच्या आयुष्यात जे काही घडले ते बदलू शकत नाही. पण तिला त्या सगळ्या गोष्टींना सामारे जाण्यात ताकद मिळो हेच मी देवाकडे प्रार्थना करते. 

‘श्री’च्या रिअल लाइफमधील दुस-या लग्नाबद्दल जान्हवी म्हणाली की ……


मालिकेच्या चित्रीकरणादरम्यानच तेजश्री आणि शशांक यांच्यात जवळीक वाढली. आणि या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.त्यांच्या या निर्णयामुळे रसिकही खूप खूश होते. मात्र रसिकांचा हा आनंद फार काळ टिकून राहिला नाही. कारण लग्नानंतर वर्षभरातच शशांक आणि तेजश्री यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.वैवाहिक जीवनात दुरावा निर्माण झाल्यामुळे शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान यांनी घटस्फोट घेतला. अवघ्या एका वर्षातच दोघांनी घेतलेल्या या निर्णयामुळे रसिकही नाराज झाले होते. 

Web Title: Tejashivin pradhan shares positive aspects of her Personal Life for the very first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.