भारती सिंग सांगतेय, लग्नानंतर हा झालाय कपिल शर्मामध्ये बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 05:28 PM2019-03-13T17:28:54+5:302019-03-13T17:31:06+5:30

लग्नानंतर कपिल खूपच बदलला आहे असे कपिलची सहकलाकार भारती सिंगचे म्हणणे आहे. भारतीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कपिल या तिच्या मित्रात झालेल्या चांगल्या बदलाविषयी सांगितले आहे.

Bharti Singh Reveals How Ginni Chatrath Is Helping Kapil Sharma Change For Good | भारती सिंग सांगतेय, लग्नानंतर हा झालाय कपिल शर्मामध्ये बदल

भारती सिंग सांगतेय, लग्नानंतर हा झालाय कपिल शर्मामध्ये बदल

googlenewsNext
ठळक मुद्देकपिल आता वेळेत चित्रीकरणाला येतो. तसेच आमचे चित्रीकरण देखील वेळेत संपते. गिन्नी ही कपिलसाठी खूप लकी असून ती खूपच चांगली आहे. ती केवळ कपिलसाठीच नव्हे तर आमच्या सगळ्यांसाठी सेटवर जेवण पाठवते. गिन्नी कपिलची प्रचंड काळजी घेते.

कपिल शर्माने त्याची प्रेयसी गिन्नी चतरथसोबत काही महिन्यांपूर्वी लग्न केले. लग्नानंतर कपिल खूपच बदलला आहे असे कपिलची सहकलाकार भारती सिंगचे म्हणणे आहे. भारतीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कपिल या तिच्या मित्रात झालेल्या चांगल्या बदलाविषयी सांगितले आहे.

कपिलचा द कपिल शर्मा शोचा दुसरा भाग प्रेक्षकांना सध्या पाहायला मिळत असून या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा कार्यक्रम टीआरपीच्या रेसमध्ये देखील टिकून आहे. कपिल शर्माच्या या कार्यक्रमाचा पहिला भाग देखील प्रचंड गाजला होता. पण कपिलच्या सतत सेटवर उशिरा येण्याने अनेकवेळा या कार्यक्रमाचे चित्रीकरण रद्द करावे लागले होते. कपिलच्या या सवयींना अनेक सेलिब्रेटी कंटाळले असल्याने त्यांनी या कार्यक्रमात येण्यास नकार दिला होता. कपिलच्या या वागण्यामुळे हा कार्यक्रम संपवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सिझनमध्ये एक वेगळाच कपिल सगळ्यांना पाहायला मिळत आहे आणि या सगळ्याचे श्रेय कपिलची सहकलाकार भारती सिंगने कपिलची पत्नी गिन्नीला दिले आहे. भारती सांगते, कपिल आता वेळेत चित्रीकरणाला येतो. तसेच आमचे चित्रीकरण देखील वेळेत संपते. गिन्नी ही कपिलसाठी खूप लकी असून ती खूपच चांगली आहे. ती केवळ कपिलसाठीच नव्हे तर आमच्या सगळ्यांसाठी सेटवर जेवण पाठवते. गिन्नी कपिलची प्रचंड काळजी घेते. ती त्याला योगा करायला लावते, जीमला जायला लावते. तसेच त्याच्या खाण्याकडे लक्ष देते. लग्नानंतर कपिल खूपच शांत झाला आहे. 

कॉमेडी किंग कपिल शर्माने गेल्या डिसेंबरमध्ये ‘द कपिल शर्मा शो’ द्वारे छोट्या पडद्यावर पुनरागमन केले. त्यापूर्वी वर्षभरात कपिलच्या आयुष्यात प्रचंड उलथापालथ झाली. तो अनेक वादांत सापडला. डिप्रेशन, मद्याचे व्यसन आदींमध्ये तो गुरफटला. यामुळे त्याचा शो बंद पडला. आता कपिल शर्माचे करिअर संपले असेच यानंतर सगळ्यांना वाटले. पण कपिलला वेळीच जाग आली आणि तो या सगळ्या दुष्टचक्रातून बाहेर पडला.

Web Title: Bharti Singh Reveals How Ginni Chatrath Is Helping Kapil Sharma Change For Good

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.