'अग्निहोत्र 2' ला रसिकांचा ना-ना, अल्पावधीत गाशा गुंडाळणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 05:20 PM2020-02-25T17:20:45+5:302020-02-25T17:24:05+5:30

'अग्निहोत्र 2' खरंतर रसिकांच्या प्रेमापोटीच पुन्हा या मालिकेच्या निर्मितीचा विचार करण्यात आला होता.

Agnihotra 2 Will End Soon ? | 'अग्निहोत्र 2' ला रसिकांचा ना-ना, अल्पावधीत गाशा गुंडाळणार?

'अग्निहोत्र 2' ला रसिकांचा ना-ना, अल्पावधीत गाशा गुंडाळणार?

googlenewsNext

तब्बल 10 वर्षानंतरही अग्निहोत्र या मालिकेविषयी  रसिकांमध्ये आजही जिव्हाळा कायम आहे. पहिल्या पर्वातलं अग्निहोत्री कुटुंब आणि आठ गणपतींच्या रहस्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. ‘अग्निहोत्र १’चे दिग्दर्शन अभिनेते-दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी केले होते. तर ‘अग्निहोत्र २’चं दिग्दर्शन भीमराव मुडे आणि कथा श्रीरंग गोडबोले यांची आहे. मालिकेचा दुसरा पर्व येणार याच बातमीने रसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. ‘अग्निहोत्र’ मालिकेच्या पहिल्या पर्वाप्रमाणेच याही पर्वाला तसाच प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा निर्मात्यांना होती मात्र तसे काही झालेच नाही. 


नवी पिढी, नवी गोष्ट रसिकांच्या पचणी काही पडली नाही. खरंतर रसिकांच्या प्रेमापोटीच पुन्हा या मालिकेच्या निर्मितीचा विचार करण्यात आला होता. मात्र मालिकेच्या टीआरपीनेही अपेक्षेनुसार उच्चांक गाठला नाही. अखेरीस मालिकेला मिळालेल्या अल्पप्रतिसादामुळे गाशा गुडांळावा लागणार असल्याची  शक्यता असल्याची चर्चा आहे. 

जुन्या मालिकेचा आशय आणि मांडणी हे प्रत्येकानेच पाहिले असल्याने तो दर्जा टिकवण्यात कुठेतरी अपयश आल्याने निर्मात्यांनाही हा निर्णय घेणे एक मोठे आव्हानच असावे.तरी मालिका एका विशिष्ट वळणावर येताच तिथंच ही मालिका संपवण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. त्यामुळे  ही मालिका बंद होणार असल्याचे शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे मालिका बंद झाल्यास कुठेतरी रसिकांचा हिरमोड होणार हे मात्र नक्की. 

Web Title: Agnihotra 2 Will End Soon ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.