राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ३५ गावांचा पाणीप्रश्न प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:21 AM2021-04-13T04:21:31+5:302021-04-13T04:21:31+5:30

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज मंगळवेढा तालुक्यातील बोराळे, नंदेश्वर, डोंगरगाव व मंगळवेढा येथे भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या ...

Water problem of 35 villages pending due to state government's refusal | राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ३५ गावांचा पाणीप्रश्न प्रलंबित

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ३५ गावांचा पाणीप्रश्न प्रलंबित

Next

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज मंगळवेढा तालुक्यातील बोराळे, नंदेश्वर, डोंगरगाव व मंगळवेढा येथे भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ आले होते. यावेळी ते बोलत होते.

व्यासपीठावर खासदार जयसिद्धेश्वर महाराज, माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, भाजप नेत्या चित्रा वाघ, आमदार प्रशांत परिचारक, माजी सहकारमंत्री आमदार सुभाष देशमुख, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सचिन कल्याणशेट्टी, धैर्यशील मोहिते-पाटील, माजी मंत्री राम शिंदे, आमदार राम सातपुते, माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, प्रा. बी.पी. रोंगे, नामदेव जानकर, बाळा भेगडे आदी उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना आजपर्यंत पाणी देतो म्हणून अनेक भूलथापा देऊन हे निवडून आले होते. पण पाणी काही मिळाले नाही. निवडणूक आली की कोणता तर बनावट कागद दाखवून फसवणूक करून मते मिळवली. सामाजिक कार्याची आवड, मेहनती संघर्ष करणारा नेता म्हणून समाधान आवताडे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. आता दामाजीच्या मागे पांडुरंग उभा असल्याने समाधान आवताडे यांचा विजय निश्चित असल्याचे ते म्हणाले.

गेल्या दीड वर्षात या सरकारचे नाव बदलून महावसुली आघाडी नाव झाले आहे. जिथे जाऊ तिथे खाऊ अशी या सरकारमधील मंत्र्यांची कामे आहेत.

कोरोनाकाळात राज्यातील नागरिकांना एकाही रुपयांची मदत ठाकरे सरकारने केली नाही. जे मुख्यमंत्री बांधावर जाऊन सांगत होते हेक्टरी ५० हजार रुपये मदत मिळवून देऊ. पण या सरकारने कवडीमोल मदत केली. सावकारी पद्धतीने वीजबिलाची शेतकऱ्यांकडून वसुली केली. थकबाकीच्या नावाखाली यांनी शेतकऱ्यांची वीज कट केली, ट्रान्स्फर उचलून नेल्याचे पाप यांनी केले असल्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

कारखान्याचा मोबदला घेतात; मग सभासदत्व रद्द कसे : आवताडे

ही निवडणूक विधानसभेची आहे. पण विकासाचा मुद्दा बाजूला ठेवून ते कारखान्याविषयी बोलत आहेत. या मतदारसंघात विरोधकांनी कोणती विकासाची कामे केली, ते सांगावे.

विरोधक दामाजीच्या सभासदांवर बोलत आहेत, अफवा पसरवत आहेत. पण दामाजीच्या एकाही सभासदाचे सदस्यत्व रद्द होणार नाही. कारखान्याचा मोबदला सर्व सभासद घेत आहेत. मग सभासत्व रद्द कसे होईल, असा प्रश्न उमेदवार समाधान आवताडे यांनी उपस्थित केला.

Web Title: Water problem of 35 villages pending due to state government's refusal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.