शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

Beraking; सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा झाला ३० हजार पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 12:28 IST

दिलासा : ग्रामीणमधील २१ हजार २०६ जणांनी केली कोरोनावर मात

सोलापूर : ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३० हजारांहून अधिक झाली आहे. यापैकी १ हजार ८१ जणांचा मृत्यू झाला असून, २१ हजार २०६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

शहरात १२ तर ग्रामीणमध्ये २४ एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. जुलैपर्यंत शहरात संसर्ग वाढला होता. त्यानंतर आॅगस्टमध्ये शहरात संसर्ग कमी तर ग्रामीणमध्ये जास्त वाढल्याचे चित्र दिसून आले. ग्रामीणमध्ये एप्रिलमध्ये केवळ दोन पॉझिटिव्ह तर एकाचा मृत्यू झाला होता. शहरातील रुग्णालय व मुंबई-पुण्याहून आलेल्या नातेवाईकांमुळे गावांमध्ये कोरोना आल्याची चर्चा सुरू झाली. मे महिन्यात ३८ पॉझिटिव्ह तर चार जणांचा मृत्यू झाला. जुलैमध्ये ही संख्या ३ हजार २९२ पर्यंत गेली. आॅगस्टमध्ये ७ हजार ८६८ पॉझिटिव्ह तर २२७ मृत्यू आणि सप्टेंबरमध्ये केवळ २३ दिवसात १० हजार ६४६ पॉझिटिव्ह तर २८८ जणांचा मृत्यू झाला. आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील रुग्णवाढ व मृत्यूचे प्रमाण जास्त दिसत आहे.

१२ एप्रिल रोजी शहरात पहिला कोरोनाचा बळी गेला. त्यानंतर २४ एप्रिल रोजी ग्रामीणमध्ये रुग्ण आढळला. मे महिन्यात रुग्णवाढीचा दर कमी होता. लॉकडाऊननंतर सर्व व्यवहार खुले झाल्यावर ग्रामीणमध्ये रुग्ण वाढत गेले. पहिल्या टप्प्यात दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, मोहोळमध्ये रुग्ण आढळले. त्यानंतर बार्शी, पंढरपूर, माढा, करमाळा, माळशिरस, सांगोला, मंगळवेढ्यात रुग्ण वाढत गेले. शहरात ८ हजार ६३ तर ग्रामीण भागात २२ हजारांचा आकडा पाच महिन्यांत पार झाला आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय