ग्रामपंचायत निवडणुका :२२६ प्रभागात अटीतटीच्या लढती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2021 05:17 PM2021-01-06T17:17:25+5:302021-01-06T17:19:13+5:30

gram panchayat Election Sindhudurg- सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७० ग्रामपंचायतींच्या सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी ६०० जागांसाठी १५३५ अर्जांपैकी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ३४२ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. १०६ जागांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने या जागा बिनविरोध झाल्या आह. त्यामुळे आता ४९४ जागांसाठी प्रत्यक्षात १०८७ उमेदवार रिंगणात रहिले आहेत. त्यामुळे २२६ प्रभागात अटीतटीची लढत होण्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Gram Panchayat elections: Fierce battles in 226 wards | ग्रामपंचायत निवडणुका :२२६ प्रभागात अटीतटीच्या लढती

ग्रामपंचायत निवडणुका :२२६ प्रभागात अटीतटीच्या लढती

Next
ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणुका :२२६ प्रभागात अटीतटीच्या लढती १०८७ उमेदवार आपले भवितव्य अजमावणार

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७० ग्रामपंचायतींच्या सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी ६०० जागांसाठी १५३५ अर्जांपैकी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ३४२ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. १०६ जागांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने या जागा बिनविरोध झाल्या आह. त्यामुळे आता ४९४ जागांसाठी प्रत्यक्षात १०८७ उमेदवार रिंगणात रहिले आहेत. त्यामुळे २२६ प्रभागात अटीतटीची लढत होण्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या असून जिल्ह्यात निवडणुकीची रणधुमाळी सोमवारपासून रंगू लागली आहे. ७० ग्रामपंचायतींच्या ६०० सदस्यपदांसाठी ही निवडणूक होत आहे. या जागांसाठी १५५० उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.

यातील १५ अर्ज छाननीच्या वेळी अवैध ठरले होते तर १५३५ अर्ज वैध ठरले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच ४ जानेवारीला तब्बल ३४२ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. ६०० जागांपैकी १०६ जागा बिनविरोध झाल्या ४९४ जागांसाठी आता प्रत्यक्षात निवडणूक होणार आहे. यात १०८७ उमेदवार आपले भवितव्य अजमावत आहेत.

त्यात देवगड तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींच्या १८९ जागांसाठी ४०४ अर्ज पात्र ठरले होते. त्यापैकी ५५ अर्ज मागे घेण्यात आले असून ३०७ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. सावंतवाडी तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींच्या ११९ जागांसाठी ३८२ अर्ज पात्र होते. त्यापैकी ११७ अर्ज मागे घेण्यात आले असून २६५ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. वैभववाडी तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींच्या १०३ जागांसाठी २३४ अर्ज पात्र ठरले होते. त्यापैकी ५५ अर्ज मागे घेतले असून १४२ उमेदवार निवडणूक लढवित आहेत.

मालवण तालुक्यातील ६ ग्रामपंचायतींच्या ५४ जागांसाठी १३७ अर्ज पात्र ठरले. त्यापैकी २८ अर्ज मागे घेण्यात आले असून १०५ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. कुडाळ तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींच्या ७१ जागांसाठी २०८ अर्ज पात्र ठरले होते. ४० अर्ज मागे घेण्यात आले असून १०५ उमेदवार निवडणूक लढवित आहेत.

कणकवली तालुक्यातील ३ ग्रामपंचायतींच्या २१ जागांसाठी ४९ अर्ज पात्र ठरले होते. १७ अर्ज मागे घेण्यात आले असून २१ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. वेंगुर्ला तालुक्यातील २ ग्रामपंचायतींच्या १८ जागांसाठी ५५ अर्ज पात्र ठरले होते. त्यापैकी ६ अर्ज मागे घेतले असून ४९ उमेदवार निवडणूक लढवित आहेत.

दोडामार्ग तालुक्यातील ३ ग्रामपंचायतींच्या २५ जागांसाठी ६६ अर्ज पात्र ठरले. त्यापैकी २४ अर्ज मागे घेण्यात आले असून ३४ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. तर जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतींच्या ६०० जागांसाठी १५३५ अर्ज पात्र ठरले. ३४२ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने १०८७ उमेदवार निवडणूक लढवित आहेत.

६०० सदस्य जागांपैकी १०६ जागा बिनविरोध झाल्या असल्याने आता ४९४ जागांसाठी १०८७ उमेदवारांचे भवितव्य १५ जानेवारी रोजी सिलबंद होणार आहे. सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी या निवडणुकीत दुरंगी व तिरंगी लढत निश्चित झाली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजप अशी जरी लढत असली तरी खऱ्या अर्थाने शिवसेना-भाजप अशीच दुरंगी लढत होणार असल्याचे दिसते.

१०६ जागाबिनविरोध

जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतींच्या ६०० जागांसाठी निवडणूक होत असून यातील १०६ जागा बिनविरोध झाल्या आहेत. यात सर्वाधिक देवगड आणि वैभववाडी तालुक्यात बिनविरोध झाल्या आहेत. त्यात देवगड ४२, वैभववाडी ३७, मालवण ४, कुडाळ ४, कणकवली ११ तर दोडामार्ग तालुक्यातील ८ जागांचा समावेश आहे.

Web Title: Gram Panchayat elections: Fierce battles in 226 wards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.