शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईअंतर्गत प्रवेश देण्यास खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:51 IST

सातारा : मुलांच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी विनाअनुदानित इंग्रजी माध्यमांच्या शाळेत २५ टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश देणे बंधनकारक असताना जिल्ह्यातील ...

सातारा : मुलांच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी विनाअनुदानित इंग्रजी माध्यमांच्या शाळेत २५ टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश देणे बंधनकारक असताना जिल्ह्यातील खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी हे प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती इन्डिपेंडेंट इंग्लिश स्कूल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

आरटीईअंतर्गत शासनातर्फे खासगी विनाअनुदानित इंग्रजी माध्यमांच्या शाळेत २५ टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश देणे बंधनकारक आहे आणि या विद्यार्थ्यांची फी शासनाने देणेसुद्धा बंधनकारक आहे. या योजनेंतर्गत खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळेत हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गेली २ ते ३ वर्ष शासनाने राज्याबरोबर सातारा जिल्ह्यातील सर्व शाळांचे करोडो रुपये खासगी शाळांचे दिलेले नाहीत. त्याचबरोबर शासन एका विद्यार्थ्यामागे १७ हजार ७०० रुपये फी परतावा २०१८-१९ पर्यंत देत होते. म्हणजे शाळांमुळे फीच्या २५ टक्केही परतावा कमीच देत होते. जिल्ह्यातील आरटीईअंतर्गत थकलेला संपूर्ण परतावा दिल्यानंतरच २०२१-२२ सालात आरटीईअंतर्गत विद्यार्थ्यांना खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश दिला जाणार आहे.

याबाबत स्कूल असोसिएशनतर्फे अ‍ॅड. अमित द्रविड यांनी आरटीई परतावा मिळावा म्हणून जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण संचालक, जिल्हाधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी यांना कायदेशीर नोटीस दिली आहे. याचे कसलेही उत्तर शासन पातळीवर प्राप्त झाले नसल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

खासगी विनाअनुदानित शाळांना कोणत्याही प्रकारचे शासकीय अनुदान किंवा कोणतीही सवलत मिळत नाही. या शाळा संपूर्णपणे विद्यार्थ्यांच्या फीवर अवलंबून असतात. जिल्ह्यातील ९८ टक्के शाळा बजेट स्कूल असून, फक्त १५ हजारांपासून २५ हजार वार्षिक फी आकारतात. कोरोना लॉकडाऊन काळात शाळांच्या फी जमा होण्यास अडचणी आल्या. शासनसुद्धा खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या नियमित विद्यार्थ्यांच्या फीबाबत ठोस निर्णय घेत नाही. त्यामुळे पालक आणि शाळा यांच्यात गैरसमज होत आहेत.

यावेळी अमित कुलकर्णी, दशरथ सगरे, मिथिला गुजर, मनिंद्र कारंडे, नितीन माने, दिलीप वेलवेट्टी, आंचल शानभाग-घोरपडे आदी संस्थाचालक उपस्थित होते.

चौकट

शाळांच्या खर्चाचाही विचार व्हावा!

शाळांना शिक्षक, कर्मचारी यांचे पगार देणे इमारत देखभाल ऑनलाइन शिक्षणासाठी होणारा खर्च, शाळा उभारण्यासाठी, मुलांच्या सुविधासाठी जागा घेणे या सर्वांसाठी कर्ज घ्यावे लागले आहे. त्याच्या परतफेडीबाबत विचार होत नाही. शासकीय कर, वीज, पाणीबिल हे कोणीही माफ केली नाही. त्यामुळे शाळा चालवायला आवश्यक निधी मिळवायचा असेल तर त्यासाठी आरटीईचे थकीत रक्कम तातडीने जमा करावी, अशी भूमिका असोसिएशनने घेतली आहे.

--