शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपटातील कामाचं स्वप्न भंगल्यानं बनला मनोरुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 19:53 IST

दत्ता यादव । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : चित्रपटात काम करण्यासाठी अनेक तरुण प्रयत्न करत असतात. मात्र, यात सगळ्यांनाच ...

दत्ता यादव ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : चित्रपटात काम करण्यासाठी अनेक तरुण प्रयत्न करत असतात. मात्र, यात सगळ्यांनाच यश येईल, हे निश्चित नसलं तरीसुद्धा अनेक युवक चित्रपटात काम करण्यासाठी संपूर्ण आयुष्यच झोकून देतात. मात्र, यात यश मिळाले नाही तर अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचे आपण पाहत असतो. असाच काहीसा प्रकार सातारा तालुक्यातील एका गावात घडला असून, एका युवकाचं चित्रपटात काम करण्याचं स्वप्न भंगल्यानं तो मनोरुग्ण झाल्याचं समोर आलं.सातारा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या ३५ वर्षीय अजयला (बदललेले नाव) शालेय जीवनापासूनच चित्रपटाचं प्रचंड आर्कषण होतं. अ‍ॅक्टिंग हे त्याच्या रक्तातच होतं. गावच्या पारावर नकला तर कधी अभिनय तो करत होता. निळू फुले यांचा तो जबरी फॅन होता. त्यांच्यासारख्या अभिनयाचा ध्यास त्याने घेतला होता. चित्रपटात काम करून आपण एक दिवस मोठे स्टार होणार, यासाठी तो प्रचंड मेहनत घेत होता. अनेक चित्रपटाच्या त्याने आॅडीशन्सही दिल्या. मात्र, अपयश जणू हात जोडून त्याच्या समोर उभं असायचं. त्यामुळे तो सतत तणावाखाली राहायचा. वडिलांच्या व्यसनाचेही टेन्शन असल्यामुळे त्याने चक्क घरातून बाहेर पडणं सोडून दिलं. वडील व्यसनी होते. मात्र, मोलमजुरी करून किमान मुलांना जगवत होते. अशातच एक दिवस वडिलांचा अपघात झाला. वडील कायमचे सोडून गेले. त्याचा धक्का त्याच्या आईला आणि दुसºया लहान भावालाही बसला. अगदी हलाखीची परिस्थिती झाली. अजयचे हळूहळू मानसिक संतुलन ढासळले. तो मनोरुग्ण म्हणूनच गावात वावरू लागला. चित्रपटात काम करण्याचं स्वप्न उराशी बाळगलेला अजय स्वत:च्या विश्वात रमून गेला. त्याची ही परिस्थिती पाहून गावकऱ्यांची मनेही हेलावून गेली. गावकºयांनी सामाजिक कार्यकर्ते रवी बोडके यांना याची माहिती दिली. त्यानंतर रवी बोडके यांनी गावात जाऊन अजयवर उपचार करण्याचा निर्णय घेतला. त्याला रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले. त्याला या आजारातून बरे करून त्याचे आयुष्य त्याला परत मिळावे, यासाठी रवी बोडके यांनी चंग बांधला आहे. पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेल्या अजयविषयी सर्व गावकºयांना सहानुभूती आहे. तो यातून लवकर बरा व्हावा, यासाठी गावकºयांचेही प्रयत्न सुरू आहेत.कुटुंबातील तिघांवर एकाचवेळी उपचार सुरूअजय आणि त्याच्या आई, भावाचे मानसिक संतूलन बिघडल्याने गावकरी चिंताग्रस्त झाले. अजयसह त्याच्या कुटुंबावर योग्य उपचार व्हावेत, यासाठी गावकºयांनी पुढाकार घेतला. सातारा तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन अजयवर उपचारासाठी प्रयत्न करण्याची मागणी गावकºयांनी केली. अखेर पोलिसांनी सामाजिक कार्यकर्ते रवी बोडके यांना बोलावून घेऊन त्यांना हा प्रकार सांगितला. त्यांनीही अजयवर तत्काळ उपचार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.