गटकोट संवर्धनाचा वाईतील तरुणांचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 12:35 PM2020-06-08T12:35:24+5:302020-06-08T12:37:45+5:30

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या वाई भूमीला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. किल्ले पांडवगड, वंदनगड, वैराटगड, केंजळगड, कमळगड हे छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची आजही साक्ष देत आहेत. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या किल्ले-गडकोटांची काळाच्या ओघात दुरवस्था होत आहे. याची जाण असल्याने भटकंती सह्याद्रीची या ग्रुपच्या तरुणांनी परिसरातील किल्ल्यांचे संवर्धन करण्याचा ध्यास घेतला आहे.

The determination of the youth of Wai to cultivate Gatkot | गटकोट संवर्धनाचा वाईतील तरुणांचा संकल्प

वाई येथील भटकंती सह्याद्रीची या ग्रुपचे सदस्य किल्ले, गटकोटांवर जाऊन स्वच्छता करत असतात. यामध्ये तरुणाई मोठ्या संख्येने आहे.

Next
ठळक मुद्देभटकंती सह्याद्रीची ग्रुपचा उपक्रम अनेक ठिकाणी स्वच्छता करून जपला इतिहास

पांडुरंग भिलारे 

वाई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या वाई भूमीला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. किल्ले पांडवगड, वंदनगड, वैराटगड, केंजळगड, कमळगड हे छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची आजही साक्ष देत आहेत. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या किल्ले-गडकोटांची काळाच्या ओघात दुरवस्था होत आहे. याची जाण असल्याने भटकंती सह्याद्रीची या ग्रुपच्या तरुणांनी परिसरातील किल्ल्यांचे संवर्धन करण्याचा ध्यास घेतला आहे.

यामध्ये वाई शहरासह तालुक्यातील युवक सहभागी आहेत. सहा महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या संवर्धन मोहिमेत पांडवगड, केंजळगड, वैराटगड, कल्याणगड, चंदनवंदन गड अनेकवेळा श्रमदान करून संवर्धन केले.

भटकंती ग्रुपचा प्रतिनिधी सौरभ जाधव म्हणाले, किल्ल्यावरील ढासलेल्या तटबंदी, ढासळलेले बुरुज, वाढलेली झाडीझुडपे, किल्ल्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे केले. तेच गडकिल्ले कोणत्या अवस्थेत आहेत बघा. त्या काळात गडकोटांनी रक्षा केली आता त्यांचे जतन करण्याची जबाबदारी आपली आहे. प्रत्येक माणसाला प्रेरणा देणाऱ्या किल्ल्यांचे संवर्धन केल्यास पुढच्या पिढीला प्रेरणा मिळणार आहे.

आता प्रत्येकाला प्रश्न निर्माण होईल की, आपण नक्की गड किल्ल्यांची रक्षा कशी करायची तर आपण सर्वांनी एकत्र येऊन जिथे-जिथे ज्या-ज्या संस्था गड-किल्ले संवर्धनाचे काम करत आहेत. त्यांच्यावर संवर्धनाचे काम करणे. तसेच आपण गड-किल्ले फिरायला जातो, तिथे कचरा दिसला की गोळा करणे आवश्यक आहे.

वाई परिसरातील सर्वच किल्ल्यांवर संवर्धन चळवळ सुरू आहे. वंदनगडला शिवंदनेश्वर प्रतिष्ठान असेल, किल्ले कमळगडला गोरक्षनाथ प्रतिष्ठान, किल्ले केंजळगडला भटकंती सह्याद्रीची परिवार यासाठी झटत आहे. या मोहिमेत सौरभ जाधव, रोहित मुंगसे, अनिल वाशिवले, अजय वाशिवले, शुभम चव्हाण, शंकर कांबळे, प्रवीण कदम, प्रमोद कदम यांच्यासह अनेक युवक भाग घेत असतात.

गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न

सह्याद्रीमध्ये असलेले किल्ले हे महाराष्ट्रातील मराठी माणसासाठी प्रेरणास्थान असून, येणाऱ्या पिढीसाठी दिशादर्शक आहेत. त्यांचे संवर्धन करणे आपले आद्य कर्तव्य आहे. तरी या मोहिमेत युवकांनी सहभागी व्हावे, असे मत भटकंती सह्याद्रीच्या सदस्यांनी व्यक्त केली.

 

Web Title: The determination of the youth of Wai to cultivate Gatkot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.