शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारचा नवा मुख्यमंत्री कोण? आज लागणार निकाल
2
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
3
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
4
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
5
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
6
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
7
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
8
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
9
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
10
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
11
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
12
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
13
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
14
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
15
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
16
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
17
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
18
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
19
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
20
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

येरळवाडी तलाव मायणी पक्षी संवर्धनमधून वगळण्याबाबतचे आंदोलन स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:26 IST

वडूज : मायणी पक्षी संवर्धन राखीवमधून येरळवाडी तलाव वगळण्यासाठी बनपुरी येथे येरळवाडी धरण बचाव समितीमार्फत सुरू करण्यात आलेले ...

वडूज : मायणी पक्षी संवर्धन राखीवमधून येरळवाडी तलाव वगळण्यासाठी बनपुरी येथे येरळवाडी धरण बचाव समितीमार्फत सुरू करण्यात आलेले उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. याबाबत प्रांताधिकारी, तहसीलदार, आंदोलनकर्ते आणि वनविभागाच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. तर १६ जुलैपर्यंत तोडगा न निघाल्यास बनपुरी, येरळवाडी, अंबवडे‌, नढवळ आदी गावातील ग्रामस्थ तलावांमध्ये जलसमाधी घेतील, असा इशाराही या वेळी देण्यात आला.

मायणी पक्षी संवर्धन राखीवमधून समूह क्रमांक २ येरळवाडी तलाव वगळण्यासाठी येरळवाडी धरण बचाव समितीमार्फत दोन दिवसांपासून खटाव तालुक्यातील बनपुरी येथे उपोषण सुरू होते. याबाबत घटनास्थळी प्रांताधिकारी जनार्दन कासार, तहसीलदार किरण जमदाडे यांच्यासोबत उपोषणकर्त्यांची बैठक झाली. त्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली. या वेळी प्रांताधिकारी जर्नादन कासार यांनी आपल्या तीव्र भावना योग्य असून त्या शासनदरबारी मांडू, असे आश्वासन दिले. तहसीलदार किरण जमदाडे यांनीही आंदोलक शेतकरी ग्रामस्थांचे आभार मानले. वनाधिकारी शीतल फुंदे यांनीही ग्रामस्थांची मागणी वरिष्ठ कार्यालयापर्यंत पोहोचवली जाईल असे स्पष्ट केले.

या आंदोलनास राजकीय, सामाजिक क्षेत्रांतील मान्यवर तसेच विविध गावांतील ग्रामस्थ, शेतकऱ्यांनी जाहीर पाठिंबा दिला होता. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी बाळासाहेब पोळ, नाना पुजारी, हणमंत देशमुख, हणमंत इनामदार, मोहन बागल, शंकर देवकर, सोमनाथ पाटील, लक्ष्मण काळे, विजय देवकर, गोपीनाथ शिंदे, बापूराव देवकर, विजय बागल, नवनाथ पोळ यांना प्रशासनाच्या वतीने लिंबू सरबत देण्यात आले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

चौकट .

रॅपिड टेस्ट निगेटिव्ह आली अन् जीव भांड्यात पडला...

उपोषणकर्त्यांची कोरोनाची रॅपिड चाचणी करण्यासाठी आरोग्य विभागाची गडबड सुरू होती. परंतु प्रांत व तहसीलदार यांच्याशी बैठक झाल्याशिवाय चाचणी करणार नाही, असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला. त्यानंतर उपोषणास बसलेल्या सर्वांची रॅपिड चाचणी करण्यात आली. यामध्ये सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला. यामुळे संबंधितांचा जीव भांड्यात पडला.

फोटो : बनपुरी, ता. खटाव येथे प्रांताधिकारी जर्नादन कासार व तहसीलदार किरण जमदाडे यांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन आंदोलनकर्त्यांनी उपोषणाला तात्पुरते स्थगित केले. (छाया : शेखर जाधव )