जिल्ह्यात कोरोनाचे ४० बळी, मुंबईवरून प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 03:30 PM2020-06-20T15:30:41+5:302020-06-20T15:31:52+5:30

सातारा जिल्ह्यात शनिवारी आणखी एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला असून, यामुळे जिल्ह्यात आता बळींची संख्या ४० तर बाधितांचा आकडा ८०४ झाला आहे.

40 victims of corona in the district, traveling from Mumbai | जिल्ह्यात कोरोनाचे ४० बळी, मुंबईवरून प्रवास

जिल्ह्यात कोरोनाचे ४० बळी, मुंबईवरून प्रवास

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात कोरोनाचे ४० बळी, मुंबईवरून प्रवास कऱ्हाडमध्ये उपचारादरम्यान मृत्यू

सातारा : जिल्ह्यात शनिवारी आणखी एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला असून, यामुळे जिल्ह्यात आता बळींची संख्या ४० तर बाधितांचा आकडा ८०४ झाला आहे.

कऱ्हाड येथील कृष्णा मेडीकल कॉलेजमध्ये एका ४७ वर्षीय कोरोना बाधित व्यक्तीचा शुक्रवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. संबंधित व्यक्ती मुंबई येथून प्रवास करून आली होती. कोरोना बाधित अहवाल आल्यानंतर संबंधित रुग्णावर कऱ्हाड येथील कृष्णा हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते.

दरम्यान, उपचार सुरू असताना संबंधिताचा रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ८०४ कोरोना बाधित रुग्ण असून,यापैकी ६०६ जण कोरोनामुक्त झाले आहेत तर ४० जणांचा बळी गेला आहे. सध्या १५८ बाधित रुग्णांवर विविध ठिकाणी विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.

Web Title: 40 victims of corona in the district, traveling from Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.