जिल्ह्यातील प्रमुख चार धरणांत १०० टक्के साठा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2020 04:48 PM2020-11-05T16:48:45+5:302020-11-05T16:52:32+5:30

koyna, dam, sataranews सातारा जिल्ह्यात यावर्षीही चांगला आणि सतत पाऊस झाल्याने सर्वच धरणे, तलाव भरले आहेत. तर सद्य:स्थिती प्रमुख सहा धरणांमध्ये १४८ टीएमसीवर पाणीसाठा आहे. यामधील चार धरणांमध्ये तर १०० टक्के पाणीसाठा टिकून आले.

100% reserves in four major dams in the district. | जिल्ह्यातील प्रमुख चार धरणांत १०० टक्के साठा..

जिल्ह्यातील प्रमुख चार धरणांत १०० टक्के साठा..

Next
ठळक मुद्देचांगल्या पावसाचा परिणाम सहा धरणांमध्ये १४८ टीएमसीवर पाणी

सातारा : जिल्ह्यात यावर्षीही चांगला आणि सतत पाऊस झाल्याने सर्वच धरणे, तलाव भरले आहेत. तर सद्य:स्थिती प्रमुख सहा धरणांमध्ये १४८ टीएमसीवर पाणीसाठा आहे. यामधील चार धरणांमध्ये तर १०० टक्के पाणीसाठा टिकून आले.

जिल्ह्यात गेल्यावर्षी पाच महिने पाऊस झाला होता. सततच्या व धुवाँधार पावसामुळे ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील प्रमुख धरणे फुल्ल झाली होती. यावर्षी मात्र, धरणे उशिरा भरली. तर यंदा जून महिन्यात मान्सूनच्या पावसालाही वेळेवर सुरुवात झाली. काही दिवस धुवाँधार पाऊस पडला. त्यामुळे धरणांमध्येही वेगाने पाणीसाठा वाढू लागला. पण, त्यानंतर पावसाने उघडीप घेतली. जुलै महिन्यात तर कमी प्रमाणात पाऊस झाला. परिणामी धरणे भरणार का अशी चिंताही निर्माण झाली होती. पण, ऑगस्ट महिना सुरू झाल्यापासून चांगला पाऊस होण्यास सुरुवात झाली.

पश्चिम भागात तर काही दिवस धुवाँधार पाऊस पडला. यामुळे कोयना, धोम-बलकवडी, उरमोडी, कण्हेर, तारळीसारख्या धरणांत वेगाने पाणीसाठा वाढला. त्यातच पाऊस सुरू असल्याने पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आला होता. तर यावर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे धरणात पाणीसाठा टिकून आहे.

जिल्ह्यात कोयना, धोम-बलकवडी, कण्हेर, उरमोडी आणि तारळी या प्रमख सहा धरणांची पाणी साठवण क्षमता १४८.७४ टीएमसी आहे. सद्य:स्थितीत या धरणांमध्ये १४८.०६ टीएमसी इतका पाणीसाठा आहे. त्यातच यातील कण्हेर, धोम, उरमोडी आणि तारळी या धरणांत किरकोळ स्वरुपात पाण्याची आवक होत आहे. तसेच अद्यापही सिंचनासाठी धरणांमधून पाणी सोडण्यात आलेले नाही. मात्र, पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी उरमोडीच्या पॉवर हाऊसमधून नदीपात्रात २०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान, खटाव तालुक्यातील येरळवाडी धरणही पूर्ण भरलेले आहे. सध्या सांडव्यातून नदीत ४७१ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

जिल्ह्यातील प्रमुख धरणांचा साठा (टीएमसीमध्ये)

धरणे         सध्या      टक्केवारी      एकूण क्षमता

  • धोम          १३.५०      १००     १३.५०
  • कण्हेर        १०.१०     १००    १०.१०
  • कोयना      १०४.६१  ९९.३६    १०५.२५
  • बलकवडी      ४.०८     १००         ४.०८
  • उरमोडी          ९.९६    १००        ९.९६
  • तारळी             ५.८१    ९९. ३०    ५.८५

Web Title: 100% reserves in four major dams in the district.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.