कोयना धरण परिसरात अतिवृष्टी, 99 टक्के भरले, सतर्क राहण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 06:06 PM2019-09-04T18:06:20+5:302019-09-04T18:10:12+5:30

सांगली : कोयना धरण पाणीसाठा 104.72 टी.एम.सी (99 टक्के) इतका झालेला आहे. कोयना धरण परिसरात अतिवृष्टी होत असून आज ...

Rainfall in Koyna Dam area, call for alert people along river banks | कोयना धरण परिसरात अतिवृष्टी, 99 टक्के भरले, सतर्क राहण्याचे आवाहन

कोयना धरण परिसरात अतिवृष्टी, 99 टक्के भरले, सतर्क राहण्याचे आवाहन

googlenewsNext
ठळक मुद्देकोयना धरण परिसरात अतिवृष्टी, 99 टक्के भरले, सतर्क राहण्याचे आवाहन वारणा धरणात 34.16  तर कोयना धरणामध्ये 104.72 टी.एम.सी पाणीसाठा

सांगली : कोयना धरण पाणीसाठा 104.72 टी.एम.सी (99 टक्के) इतका झालेला आहे. कोयना धरण परिसरात अतिवृष्टी होत असून आज सकाळी 10.45 वाजता कोयना धरणाचे रेडियल गेट 8 फूटाने उघडण्यात आले. पाण्याचा विसर्ग 73 हजार 63 क्युसेक्स इतका करण्यात आला आहे. तसेच वारणा धरणातील विसर्ग 3 हजार 620 क्युसेक्स इतका आहे.

यामुळे सांगली येथील सद्याच्या कृष्णा नदीच्या पात्रामधील पाण्याची पातळी 25 फूटापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या विशेषत: वाळवा, शिराळा, मिरज, पलूस तालुक्यातील तसेच महानगरपालिका क्षेत्रातील लोकांनी सावधानता बाळगावी व नदीपात्रामध्ये कोणीही जावू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

कोयना नदीकाठची गावे, वाड्या, वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षेच्या कारणास्तव नदीपात्रात प्रवेश करु नये व सुरक्षेची काळजी घेवून सतर्क रहावे, असे आवाहन सांगली पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नामदेव करे यांनी केले आहे. धरणामध्ये पुढील प्रमाणे पाणीसाठा व विसर्ग चालू आहे.

कोयना धरणात 104.72 टीएमसी पाणीसाठा असून हे धरण 99 टक्के भरले आहे. कोयना धरणातून 73 हजार 63 क्युसेस्क पाण्याचा विसर्ग सुरु आहे. धोम धरणात 12.82 टीएमसी पाणीसाठा असून हे धरण 95 टक्के भरले आहे. धोम धरणातून 460 क्युसेस्क पाण्याचा विसर्ग सुरु आहे. कन्हेर धरणात 9.89 टीएमसी पाणीसाठा असून हे धरण 98 टक्के भरले आहे. कन्हेर धरणातून 50 क्युसेस्क पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

उरमोडी धरणात 9.90 टीएमसी पाणीसाठा असून हे धरण 99 टक्के भरले आहे. उरमोडी धरणातून 450 क्युसेस्क पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तारळी धरणात 5.20 टीएमसी पाणीसाठा असून हे धरण 89 टक्के भरले आहे. वारणा धरणात 34.16 टीएमसी पाणीसाठा असून हे धरण 99 टक्के भरले आहे. वारणा धरणातून 3620 क्युसेस्क पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

पावसाची आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे.

कोयना 71,
नवजा 90,
महाबळेश्वर 104,
धोम 20,
कन्हेर 12,
उरमोडी 14,
तारळी 2
 वारणा 36.

वारणा धरणात 34.16  तर कोयना धरणामध्ये 104.72 टी.एम.सी पाणीसाठा

सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात दिनांक 4 सप्टेंबर रोजी सकाळी 8 पर्यंत 34.16 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

दिनांक 4 सप्टेंबर रोजीच्या सकाळी 8 वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये 104.72 टी.एम.सी. इतका पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता 105.25 टी.एम.सी, आहे. धोम धरणात 12.82 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 13.50 टी.एम.सी, कन्हेर धरणात 9.89 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 10.10 टी.एम.सी. आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात 25.10 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 25.40 व राधानगरी धरणात 8.36 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 8.36 टी.एम.सी.आहे. अलमट्टी धरणाची साठवण क्षमता 123 टी.एम.सी. असून हे धरण 100 टक्के भरले असल्याचे जलसंपदा विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे वारणा धरणातून 3620 क्युसेक्स तर कोयना धरणातून 27 हजार 659 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. अलमट्टी धरणातून 60 हजार 283 क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे. आयर्विन पुल सांगली येथे 10 फूट 6 इंच इतकी पाण्याची पातळी आहे (धोका पातळी 45 फूट) तर अंकली पुल हरिपूर येथे 14 फूट 9 इंच इतकी पाण्याची पातळी आहे (धोका पातळी 50 फूट 3 इंच).

जिल्ह्यात सरासरी 2 मि. मी. पावसाची नोंद

जिल्ह्यात कालपासून आज सकाळपर्यंत सरासरी 2 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. 

मिरज -1.6 (494.6),
जत - निरंक (183.8),
खानापूर-विटा - निरंक (311.6),
वाळवा-इस्लामपूर -2 (668.9),
तासगाव -0.3 (378.5),
शिराळा - 13.8 (1721),
आटपाडी - निरंक (184.1),
कवठेमहांकाळ - निरंक (289.2),
पलूस - 0.3 (401.8)
 कडेगाव - 0.6 (664.8).





 

 

Web Title: Rainfall in Koyna Dam area, call for alert people along river banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.